उमरगा :- राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती , माता जिजाऊ जयंती निमित्त 2047 मध्ये विकसित भारत करण्यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचार आणि कार्याचा तर युवतीने जिजाऊ मातेचे विचार आणि कार्य कर्तुत्वाचा अभ्यास करावा. त्याला नावीन्याची आणि संशोधनाची जोड द्यावी. त्याचा वापर आजच्या आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, पर्यावरण, राजकीय, सामाजिक अशा समस्या सोडवण्यासाठी करावा. तरच 2047 सली विकसित भारत होईल असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना केले.जागतिक युवा दिनानिमित्त येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य अस्वले यानी विद्यार्थ्यानी आपल्या समोरील आव्हानांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. उच्च ध्येय ठेवून ध्येयसिद्धीसाठी सतत प्रयत्नवत राहावे असे आव्हान केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रबंधक श्री राजकुमार सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.मुरलीधर जाधव यांनी मानले.