उमरगा:- शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी येथे ‘वाचन संकल्प ममहाराष्ट्राचा’ जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान वाचन पंधरवाडा राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महविद्यालयात भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ.बालाजी इंगळे यांची उपस्थिती होती. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच उमरगा शहरातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, फार्मसी विद्यालये, इंग्लिश स्कुल, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, जीवनचरित्र, धर्मग्रंथ, कविता, कथासंगृह, बालगीते अशा विविध प्रकारचे अवांतर वाचनाचे साहित्य ग्रंथप्रदर्शनात उपलब्ध होते. यादरम्यान घेण्यात आलेल्या पुस्तक सारांश लेखन स्पर्धा व पुस्तक सारांश कथन स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. पुस्तक लेखन कथन स्पर्धेमध्ये कु. सानिया गुलफरोश प्रथम (डॉ.के.डी.शेंडगे इंग्लिश स्कुल) , कु. प्रतिक नारायणकर द्वितीय, कु. श्रद्धा पाटील तृतीय तर कर्मचारी गटात बालाजी हिपरगे (कै. शरणाप्पा मलंग विद्यालय) प्रथम तर अमोल बिराजदार द्वितीय असे क्रमांक पटकाविले. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुस्तक सारांश लेखन स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात बी.फार्म प्रथम वर्षातील कु.समर्थ शिंदे प्रथम, कु. साक्षी बाचके द्वितीय, कु. साक्षी गावडे तृतीय तर कर्मचारी गटात अमोल बिराजदार प्रथम व प्रा.धनश्री भुजंगे द्वितीय असे क्रमांक मिळवले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
वाचन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, जीवनात मोठे यश गाठण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे डॉ. बालाजी इंगळे यांनी सांगितले. कार्यक्रम समन्वयक म्हणून ग्रंथपाल अमोल बिराजदार यांनी काम पहिले. ग्रंथप्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.अंकिता वडजे, प्रा.धनश्री भुजंगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अमोल बिराजदार यांनी मानले.