आईच्या- वडिलांच्या जीवनातील गरीबीच दारिद्र्य दुर करावयाचे असेल तर शिक्षण हे महत्त्वाचे – डॉ.भागिरथी पवार

0
135

नारंगवाडी :- उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे दि. 25 रोजी नारंगवाडी करांच्यावतीने डॉ. भागिरथी भरत पवार यांची Dysp/Acp पदी निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल नारंगवाडीकरांच्या वतीने भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले ,अन्नसुरक्षा अधिकारी दयानंद पाटील, शेषेराव पवार,पोलीस पाटील हेमंतराव पाटील, सरपंच शेखर घंटे,मुख्याध्यापक अजय पवार,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण,उपसरपंच कुमार पवार,सेवा समूहाचे अध्यक्ष विठ्ठल चिकुंद्रे, अमोल चव्हाण,ग्रामसेवक जगदीश जाधव,आकाश पवार आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.भागीरथी पवार आपल्या मनोगतात म्हणाल्या आईच्या हातातील खुरप आणि वडिलांच्या हातातलं कावड सोडायचं असेल आणि त्यांच्या जीवनातील गरीबीच दारिद्र्य कायमच दुर करावयाचे असल्यास चांगले शिक्षण आत्मसात करुन यशस्वी होणे महत्वाचे आहे.मला माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेने हातात पेन्सिल,पेन आली तदनंतर इंजेक्शन आले. आता बंदूक आली ही आहे शिक्षणाची ताकद.mpsc/upscचे वेड होते जे मला बसू देत नव्हते,डॉक्टर झाले,कक्ष अधिकारी,असिस्टंट कमिशनर, सेल टॅक्स अधिकारी सहा परीक्षेत उत्तीर्ण होऊन मी आता डीवायएसपी पद हे हातात घेतले.एक एमबीबीएस म्हणजे शंभर एकर जमीन घेतल्यासारखे.ह्या जन्मात मला आई-वडिलांचे ऋण फेडणे शक्य नाही. पुढच्या जन्मी मी मानवाच्या जन्माला आले तर ह्याच आई-वडिलांच्या पोटी यावं.अशी इच्छा याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकीन सांगवे, अमोल पवार,नागेश घंटे, नितीन कुलकर्णी,भरत मुगळे,पी.के.कारागीर, अविनाश पुजारी,यांनी परिश्रम घेतले,सूत्रसंचालन नितीन सूर्यवंशी यांनी तर आभार विठ्ठल चिकुंद्रे यांनी केले यावेळी गावातील नागरिक महिला विद्यार्थी व नारंगवाडी सेवा समूहाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here