इकबाल मुल्ला
लोहारा :- मुंबई येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेतली. “औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीकरण व विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तूर खरेदीला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात यावी” अशी विनंती त्यांना केली. यावेळी महाराष्ट्र आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ.ओमप्रकाशजी शेटे उपस्थित होते.