कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास हा कृषी क्षेत्राच्या विकासामुळे शक्य होणार नाही.मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत नसल्याने आणि अनेक व्यवस्थात्मक अडचणींमुळे शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करत आहेत.या पार्श्वभूमीवर,केंद्र सरकारने “ॲग्रीस्टॅक” (AgriStack) या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे.ही योजना भारतीय शेतीच्या डिजिटल रूपांतरणाचा एक भाग आहे.शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान,माहिती आणि सेवांचा लाभ देण्यासाठी तयार केली जात आहे.
*ॲग्रीस्टॅक म्हणजे काय*
ॲग्रीस्टॅक हा भारतीय शेतीसाठी तयार करण्यात आलेला एक मोठा डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आहे.या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा आणि त्यांच्या शेतीच्या माहितीचा एक स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार केला जात आहे.यामध्ये जमिनीचा प्रकार, हवामान,लागवडीचे पद्धती, पाणीपुरवठा,पीक प्रकार,उत्पादन आणि विक्रीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबीची माहिती असणार आहे.ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी स्थापन स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज,उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा,विपणन स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक,सोपी आणि प्रामाणिकपणाची पद्धत विकसित करणे,शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे आणि उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्रोटेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे आणि कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रीस्टॅक योजनेचा उद्देश आहे.
*योजनेची वैशिष्ट्ये*
*डिजिटल शेतकरी ओळखपत्र* प्रत्येक शेतकऱ्याला एक विशेष डिजिटल ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जाणार आहे. ज्यामुळे त्याच्या शेताचा आणि उत्पादनाचा संपूर्ण डेटा व्यवस्थित संग्रहित करता येणार आहे.
*डेटा अनालिटिक्स आणि पूर्वानुमान*
हवामानाचा अंदाज,जमिनीची सुपीकता,कीड व रोग यासारख्या माहितीचा अचूक अंदाज बांधून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जाणार आहे.
*कर्ज आणि विमा सुलभता* शेतकऱ्यांचा डिजिटल डेटा बँका आणि विमा कंपन्यांशी जोडला जाईल.त्यामुळे त्यांना सहज कर्ज व विमा योजनांचा लाभ मिळेल.
*ई-कॉमर्स आणि थेट विक्री*
शेतकरी त्यांचा माल थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवरून विकू शकतील, त्यामुळे दलालांची मध्यस्थी टाळता येईल आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल.
*सरकारी योजनांचा थेट लाभ*
विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक सहज संधी मिळेल.अनुदाने आणि आर्थिक मदतीसाठी अनावश्यक कागदपत्रांची गरज भासणार नाही.
*शेतकऱ्यांना होणारे फायदे*
शेतकऱ्यांना या योजनेमुळे जे फायदे होणार आहेत.ते पुढीलप्रमाणे आहे.१. अधिक माहितीपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास त्यांचे उत्पन्न वाढू शकते.हवामान, बाजारभाव,शेतीसाठी लागणाऱ्या कृषीविषयक निविष्ठा यांची माहिती सहज उपलब्ध होईल.२. अधिक उत्पादन आणि उत्पन्न – सुधारित लागवड तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि खतांचा अचूक वापर केल्याने उत्पादनवाढ होईल.3. मध्यस्थांची साखळी कमी होणार – ई-कॉमर्स आणि थेट विक्री प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा अधिक फायदा मिळेल.४. कर्ज आणि विमा प्रक्रियेत पारदर्शकता – बँका आणि वित्तसंस्थांना शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध असल्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद आणि सुलभ होईल.५. नवीन तंत्रज्ञानाचा वापर – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक उपाय मिळण्यास मदत होणार आहे.६. किमान आधारभूत किमतींवर
खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण
ऑनलाईन पद्धतीने होईल.७. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज
मिळविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड
आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व
शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज
उपलब्ध करून घेण्यात सुलभता
येईल.ॲग्रीस्टॅक योजना ही भारतीय कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडविणार आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर शेती करता येईल.ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे.
*संकलन*
*जिल्हा माहिती कार्यालय,*
*धाराशिव*