मराठवाड्याचा दुष्काळ मुख्यमंत्री फडणवीसच संपवू शकतात — ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

0
52

 

लोहारा:- दुष्काळग्रस्त मराठवाड्याला विविध सिंचन योजना च्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच न्याय देऊ शकतात व मराठवाड्यातील दुष्काळ संपवू शकतात असे मत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी परंडा येथे सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे हे परंडा तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. नुकतीच त्यांची धाराशिव जिल्हा संपर्कमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसेच माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी परंडा शहर व तालुक्याच्या वतीने दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री जयकुमार गोरे व सुजितसिंह ठाकूर यांचा फटाक्याच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी जंगी सत्कार केला. परंडा शहरातील प्रितम मंगल कार्यालयात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची व सुजितसिंह ठाकूर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मराठवाड्याचा दुष्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संपवू शकतात असे मत यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले व पुढे बोलताना गोरे म्हणाले की, मंत्रीपद माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हते भाजपची वाटचाल अतिशय संघर्षातून झाली आहे बेघरांसाठी घर ही पंतप्रधान मोदी यांची संकल्पना राबवण्यासाठी 20 लाख घरांची उद्दिष्ट पूर्ती करीत आहोत. विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो लोक तळमळत असतात त्या विठुरायाचं नियोजन जबाबदारी मला सोलापूरचा पालकमंत्री झाल्यानंतर मिळाली आणि आता आई तुळजाभवानीच्या धाराशिव जिल्ह्याचा भाजपा संपर्क मंत्री म्हणून माझी निवड झाली हे सुद्धा माझे भाग्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची हेळसांड होणार नाही आता गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे यापुढे 2029 सालाची निवडणूक भाजपा स्वबळावर लढविणार आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे मंत्री गोरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना भाजपाचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाच्या काळात भाजपाच्या नेत्यांच्या प्रत्येक रॅलीचे व यात्रेचे नियोजन हे सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे. त्यांचे कार्य म्हणजे निस्वार्थ सेवा असे आहे. त्यामुळे ते भाजपाच्या कार्यकर्ता व नेते यांच्यामधील दुवा आहेत असे मत आमदार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.माजी आ सुजितसिंह ठाकूर सत्काराचे उत्तर देताना म्हणाले कि, माझी शक्ती आणि ताकद काय आहे तर माझ्यावर प्रेम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मला पक्षात लाखो लोकांचे प्रेम मिळाले आहे माझ्यात शेवटचा श्वासा असे पर्यंत मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करेल असे उद्गार ठाकूर यांनी काढले. कार्यक्रमासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड. खंडेराव चौरे, अँड.अनिल काळे, प्रवीण पाठक, जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, इंद्रजीत देवकते, अँड गणेश खरसडे, सुबोधसिंह ठाकूर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. झहीर चौधरी, गुलचंद व्यवहारे, राजाभाऊ मलबा, सचिन घोडके, सतीश देशमुख, डाँ आनंद मोरे, सागर पारडे, युवा नेते समरजितसिंह ठाकूर, सुरेश कवडे, आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे सुखदेव टोंपे, निशिकांत क्षिरसागर, सुबोधसिंह ठाकुर, बाबासाहेब जाधव, उमेश गोरे, झहीर चौधरी, विकास कुलकर्णी, श्रीराम देवकर सर, जगदीश डाके, बिट्टू मदने, सिद्दीकि हान्नुरे, आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here