नळदुर्ग :- येथे ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य प्रतिमा पुजन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक बलभिमराव मुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन अणदुर येथील जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, तलाठी संध्या कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नितीन कासार, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, बसवराज धरणे, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे आदिजण उपस्थित होते.या कार्यक्रमात पुणे येथील कु. पुर्वा शिवप्रसाद काणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याच कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवुन शासकीय सेवेत दाखल झालेले शहरातील प्रणाली केसकर, शुभांगी गायकवाड, शुभदा जोशी, राज जगदाळे यांचा ब्राम्हण समाज संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व मराठी शिक्षकांचा व पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. जयश्री घोडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना कु. पुर्वा काणे यांनी म्हटले की, देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आयुष्यभर इंग्रजांशी लढा दिला त्यांचा हा त्याग आणि बलिदान भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठी भाषेसाठी सावरकरांचे कार्य मोठे आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र आज प्रत्येकजण आपल्या मुलाला मराठी ऐवजी इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवीत असल्याने आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्यासचेही कु.पुर्वा काणे यांनी म्हटले आहे.यावेळी बलभिमराव मुळे, डॉ. खजुरे, व कमलाकर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात नळदुर्ग शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य स्मारक उभरावे त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा हे मांडण्यात आलेले ठराव एकमताने मंजुर करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक अमृत पुदाले,सुधीर हजारे,महालिंग स्वामी,संतोष पुदाले,रमेश जाधव,पत्रकार विलास येडगे,दिपक जगदाळे,श्रीकांत अणदुरकर,उत्तम बनजगोळे,मारुती खारवे,उमेश जाधव,सुभद्राताई मुळे,सुप्रियाताई पुराणिक,संध्याताई भुमकर यांच्यासह महिला,सावरकर प्रेमी व हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांच्यासह संघटनेचे मुकुंद नाईक,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक,सचिन भूमकर,प्रदीप ग्रामोपाध्ये,सदानंद नाईक,ज्ञानेश्वर केसकर,अजय देशपांडे,प्रसन्न कुलकर्णी,संतोष नाईक,सौरभ रामदासी,राजकुमार वैद्य,संदीप वैद्य,अजित भुमकर,मयुर जोशी,सुदर्शन पुराणिक,गजानन कुलकर्णी,संकेत भुमकर यांनी परीश्रम घेतले,कार्यकमाचे सुत्रसंचलन प्रमोद कुलकर्णी आणि सौरभ रामदासी यांनी केले.प्रास्ताविक विनायक अहंकारी यांनी केले तर आभार मुकुंद नाईक यांनी मानले.