लोहारा :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेली अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा आहे, असे भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित, मध्यमवर्गीय आणि उद्योजक यांसारख्या विविध घटकांना समोर ठेऊन या घटकांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी महत्वपूर्ण नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, रस्त्यांचे जाळे, विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रावर भर दिल्याने मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा राज्याच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेला दृष्टीकोन दिसून येतो, असे माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.