विद्यार्थ्यांनी लेखन कौशल्य वृद्धिंगत करावे – डॉ. संजय अस्वले 

0
67

 

उमरगा:  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने ‘लिटरेचर अँड माॅरल व्हॅल्यूज’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम दि. 2 एप्रिल  रोजी करिअर कट्टा हॉलमध्ये करण्यात आला होता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

इंग्रजी विभागाच्या वतीने दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ असे बक्षीसाचे स्वरूप होते. यावर्षीच्या निबंध स्पर्धेत कु. येवते तृप्ती दयानंद (प्रथम), कु.माळी अमृता संतोष (द्वितीय), कु. घोडके साक्षी संजय (तृतीय) आणि चव्हाण प्रज्वल तात्याराव (उत्तेजनार्थ) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलताना अस्वले सर यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याविषयी आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे ती विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यास सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. विलास इंगळे सर (उपप्राचार्य, विज्ञान शाखा), प्रा.डॉ. पिठले सर (उपप्राचार्य, कला शाखा), डॉ. एस.डी. मुंगळे, डॉ. सी. डी. करे , डॉ. संतोष सुरवसे, डॉ. बी. ए. शेळके, डॉ. पसरकल्ले व तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. डी. देशमुख सर व आभार प्रा. डॉ. एस. टी तोडकर सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here