लोहारा :- तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.1 एप्रिल रोजी 1998 च्या दहावी व 2000 च्या बारावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी व गुरुजनांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास शिक्षण मंडळाचे उपाधक्ष श्री्युत मदने गुरुजी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक व सरपंच प्रतिनिधी श्रीयुत सुभाषमामा सोलंकर, संस्थेचे सचिव प्रथ्वीराज पाटील, संस्थेचे संचालक मंडळातील प्रमुख सदस्य उपथित होते. यावेळी गुरुजनाचं व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सर्व उपस्थित विद्यार्थ्यानी फुलांची उधळण व ढोल ताश्याच्या गजरात करुन त्यांना व्यासपीठापर्यंत नेऊन असणस्थ केले. यानंतर शंखनाद, उपस्थित सर्व माजी मुख्याध्यापक (हन्नूरे गुरुजी, लोखंडे गुरुजी, गुरव गुरुजी, बेंडगे गुरुजी) यांच्या हस्ते विधेची आराध्य देवता माता सरस्वतीचे पूजन व कार्यक्रमाचे अद्यक्ष मदने गुरुजी, प्रमुख पाहुणे सुभाषमामा सोलंकर, सचिव प्रथ्वीराज पाटील, जेष्ठ गुरुवर्य सुरेश पुजारी गुरुजी व विद्यार्थी प्रतिनिधी अमर राघोजी व नागिणी कदारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व दिवंगत गुरुजन, सेवक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थित 21 गुरुजनांचा विद्यार्थ्यांकडून शाल, पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सुरवातीच्या काही गुरुजनाचे सत्कार प्रमुख पाहुणे व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले व नंतरचे सर्व सत्कार एकजण मुलानं मधला व एकजण मुलीनं मधल्या विधार्थी प्रतिनिधीनी केला. गुरुजनांच्या सन्मानासोबत 3 आदर्श सेवकांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कुमार वैभव पाटील, कुमार स्वराद गेजगे या छोट्या मुलांनी गुरुशिष्यावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी विद्यार्थ्याची शालेय जीवनातील आठवणीपर भाषणे झाली. यात माजी विद्यार्थी बिरबल कोकरे, सौ.सारिका जंगले, सौ.कविता राठोड, सुशील पुजारी, मनोज पुजारी, सौ.अनुपमा केशरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुण्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर गुरुजनाची मार्गदर्शन पर भाषणे झाली. यात हन्नूरे गुरुजी, बेंडगे गुरुजी, गेजगे गुरुजी, चंदनशिवे गुरुजी, सूर्यवंशी गुरुजी, गुरव गुरुजी, सुरेश पुजारी गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील पुजारी यांनी केले तर आभार सौ.मीनाक्षी पुजारी यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर सोमवंशी अमर,,राघोजी दिगंबर लाड, सुशील पुजारी, बाळासाहेब खंडाळकर, राजेंद्र गोगावे, बिरबल कोकरे, राजेंद्र पाटील, चनप्पा काशेट्टी, विक्रम मोरे, संजय हरवले, मैनूद्दीन काझी, शट्टाप्पा दुतर्गे, संदीप पुजारी, विजय अष्टगे, अनिल ठेंगिल, विकास मिलगिरी, नागनाथ भोसले, भीमराव उपासे, उमाकांत पाटील, दत्ता बंदीछोडे, लक्ष्मण पाटोळे, संजय वाकळे, सदानंद जमादार, संजय राठोड, अब्दुल शेख, शिवाजी पवार, महेबूब जमादार, प्रदीप पुजारी, माहंतेस्वर पाटील, भाऊसाहेब पवार, शैलेश चौहान, उमराव गोपणे, प्रमोद सुरवसे, गोपीचंद जाधव, परमेश्वर कमळापुरे, अमर चव्हाण, अमीर पटेल, बाबुराव बिराजदार, उद्धव माने, बालाजी कोकाटे, दिगंबर वाघमारे, करण माने, सतीश धायगुडे, परमेश्वर शिंदे, यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.