उमरगा :- तालुक्यातील कवठा येथील मुस्लिम बांधव यांनी नवीन वक्फ कायदा दुरुस्ती आम्हाला मान्य नसून तात्काळ केंद्र शासनाने संबंधित कायदा बिल माघार घ्यावे, या मागणी करीता प्रत्येक मुस्लिम बांधवाने हाताला काळ्या फीती लावून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करत.रमजान ईद ची नमाज पठण केले. दि. 31 मार्च ईदच्या पवित्र दिवशी कवठा गावातील समस्त मुस्लिम समाजाने सरकारच्या नव्या वक्फ कायद्याविरोधात एकजूट दाखवत काळ्या पट्ट्या बांधून शांततामय निषेध नोंदवला. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते कासीम शेख तसेच गावातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधव – फारूक शेख, सद्दाम शेख, हुजूर शेख, जावेद शेख, सलीम शेख, सादिक पठाण, सलीम मुल्ला, आसिफ शेख, अरशद मुल्ला, इरशाद शेख, महेबूब बागवान आणि इतर नागरिक सहभागी झाले होते.नव्या वक्फ कायद्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांवर परिणाम होण्याची भीती असल्याने सर्व नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात आवाज उठवला. आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी प्रशासनाकडे हा कायदा त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.कायद्याविरोधात एकजूट आणि शांततेचा संदेश या वेळी सामाजिक कार्यकर्ते कासीम शेख यांनी सांगितले की, “हा कायदा मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने, लोकशाही प्रक्रियेतून हा कायदा मागे घेण्यासाठी संघर्ष करू.”गावातील मुस्लिम बांधवांनी निषेध म्हणून काळ्या पट्ट्या बांधून एकतेचे प्रदर्शन केले.ईदच्या दिवशी, 31 मार्च 2025 मोठ्या प्रमाणावर जमलेल्या नागरिकांनी सरकारच्या या धोरणाविरोधात शांततेत निषेध करत लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शवला.