जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात वीरशैव धर्मातील 18 जंगम बटुनां अय्याचार व तब्बल 642 वीरशैव भक्तांना विधीवत शिवलिंग दीक्षा संस्कार 

0
100

लोहारा  :- तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात शनिवारी दि.5 एप्रिल रोजी परिसरातील वीरशैव धर्मातील 18 जंगम बटुनां अय्याचार व तब्बल 642 वीरशैव भक्तांना विधीवत शिवलिंग दीक्षा संस्कार देण्यात आले. पाच तास चाललेल्या या मंगलमय सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेवळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन व विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोमवारी दि.7 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमाचे रेलचेल असून दरम्यान शनिवारी दि.5 एफ्रिल रोजी परिसरातील वीरशैव धर्मातील जंगम बटुनां अय्याचार व नागरिकांसाठी शिवलिंग दीक्षा संस्काराचे आयोजन केले होते. यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून परिसरातील अनेक गावातून जवळपास एकूण तब्बल 660 वीरशैव धर्मातील जंगम बटुनी अय्याचार व वीरशैव धर्मातील नागरिकांनी दीक्षा घेतली. यावेळी मनिप्र गंगाधर महास्वामीजी (जेवळी), सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (लोहारा), दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी (वसमत), गुरुमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी (पाळा) व महादेव शिवाचार्य महास्वामीजी (वाई) यांच्या हस्ते अय्याचार व शिवदीक्षा संस्कार देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व महास्वामीजीनी, ‘वीरशैव धर्म परंपरेनुसार सोळा संस्कारांपैकी शिवदीक्षा व अय्याचार संस्कार हे महत्त्वाचे असून विधिवत दीक्षा संस्कार घेणे वीरशैवाना जन्मसिद्ध अधिकार आहे. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रम्हांडाचे प्रतीक आहे. दीक्षा संस्कार घेऊन प्रत्येकांने सदाचरण केले पाहिजे असा उपदेश केला. यावेळी वेदमूर्ती बसवराज शास्त्री (तीर्थ ता. अक्कलकोट) यांनी या कार्यक्रमाचे पोरोहित्य केले.

# या निमित्त येथे आठवडाभर शिव कथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा संगीत शिवकथेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी मठ, मंदिराला विद्युत रोषणाई केले आहे. व्यासपीठाचे दररोज नवीन सजावट केली जात आहे. परिसरातून एक लाख भाविक भक्त येणार असल्याचे गृहीत धरून येथील मठ परिसरात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहे. सभा मंडपात भाविकासाठी आधुनिक पद्धतीने प्रकाश ज्योत (लाईट), साऊंड सिस्टिम, एलईडी स्क्रीन, कुलर पंखे बसवण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांना दररोज महाप्रसादाचे व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. वाहनासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून व्यवस्थेसाठी विविध समित्या तयार करण्यात आल्याने यावेळी गर्दी असूनही कार्यक्रम सुरळीत पार पडत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here