धाराशिव विमानतळाचे संचालन पुन्हा एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे

0
41

 

धाराशिव :- येथील हवाई धावपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९ जून २००६ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली होती.त्यानंतर या विमानतळाचे संचालन ३ नोव्हेंबर २००९ पासून धाराशिव एअरपोर्ट प्रा. लि.यांच्याकडे देण्यात आले होते.धाराशिव विमानतळाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी,तसेच हवाई सेवांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एअरपोर्ट प्रा.लि.यांना ९५ वर्षांच्या भाडे करारावर विमानतळ चालविण्याचा अधिकार देण्यात आला होता.मात्र, निर्धारित कालावधीपूर्वीच हा करार आता संपुष्टात आणण्यात येत असून, ८ एप्रिल २०२५ पासून विमानतळाचे संचालन एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (AAI) परत देण्यात येणार आहे.विमानतळाच्या विकासासाठी येत्या काळात सुसज्ज टर्मिनल,रनवेचे आधुनिकीकरण,वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा आदी कामे करण्यात येणार असल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे संयुक्त संचालक श्री.डी.बी.खाडे यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विमानसेवा नियमित होण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here