वादळी वा-यासह अवकाळी पावसाच्या तडाख्याने आंबा फळबागांचे नुकसान

0
48
Note: ??????? ???? ??????, ?????? ??????? ????

उमरगा : तालुक्यातील ब-याच भागातील परीसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्याने पेठसांगवी, नारंगवाडी, माडज, नाईचाकुर, मुरुम, तुगाव, येणेगुर, चिंचोली भु., बेडगा, भिकार सांगवी, दगडधानोरा, डिग्गी, मळगी या भागात दि.8 रोजी आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे.वादळी पावसाचा तडाखा बसल्याने ऊस, कांदा पिकासह आंबा, पपई, द्राक्ष यासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे.तालुक्यातील पेठसांगवी, नारंगवाडी, माडज, नाईचाकुर, मुरुम, तुगाव, येणेगुर, चिंचोली भु., बेडगा, भिकार सांगवी, दगडधानोरा, डिग्गी, मळगी आदी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व पावसाने सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या सुसाट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची धांदल उडाली. दोन दिवसांपासून वातावरणात बदल व हवामानाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने शिवारातील आंब्यासह पपई, कांदा पिकांसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील पेठसांगवी येथील शेतकरी ईमाम दस्तगीर पठाण, महेबूब पठाण यांच्या दोन एकर आमराईतील 100 आंबा झाडांच्या कैऱ्यांचा सडा पडला. शांत कुमार मोरे यांच्या दोन एकरातील पपईच्या बागेचे आणि तुगाव शिवारात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आमराईत रानावर कैऱ्या पडल्याने नुकसान झाले. कडब्याच्या गंजीवरील पत्रेवादळी वाऱ्याने उडून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here