दहशतवादाला धर्म जात नसते ; हा देशावरील हल्ला – प्रा . सुरेश दाजी बिराजदार

0
143

 

उमरगा : पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 29 जण मृत्युमुखी पावले . यावेळी महाराष्ट्रातले पर्यटक उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनासाठी पहेलगाम येथे दि .२२ रोजी उपस्थित होते . यावेळी घडलेल्या थरारक घटनेची माहिती त्यांनी पत्रकारांना बोलताना दिली .   प्रा बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशाचे नंदनवन असलेल्या भागात दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला निषेधार्य आहे . या हल्ल्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो . हल्ला झाल्यानंतर लगेचच सैन्याने या परिसराचा ताबा घेतला असून सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे . आमच्या समवेत आलेले सर्व पर्यटक सुखरूप आहेत . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा . ना . अजित दादा पवार यांनी दूरध्वनीद्वारे विचारपूस करून या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे .  कश्मीरमध्ये पर्यटनासाठी फिरत असताना येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता स्थानिक नागरिक दहशतवाद्यांच्या व पाकिस्तानच्या विरोधात असल्याचा जनमानस आहे . अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचला आहे . जेणेकरून येथील यात्रेवर व पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे . येथील नागरिकांना उपजीविकासाठी पर्यटन व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते . अशा हल्ल्यामुळे पर्यटनावर परिणाम होऊन येथील नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होनार आहे . काही स्थानिक नागरिक अक्षरशः अश्रू आणून या घटनेमुळे आमच्या रोजी रोटी वर परिणाम होणार असल्याचे बोलून दाखवत होते . दहशतवादाला व दहशतवाद्यांना धर्म जात नसते, हा देशावरील भ्याड हल्ला आहे . या घटनेवेळी आम्हाला मदत करणारा ड्रायव्हर माजीद खान हा मुस्लिम समाजाचा तरूण अशा परिस्थीतीत धाराशीव येथील पर्यटकानां आपल्या स्वतःच्या घरी राहण्याची विनंती करत होता. भारतीय म्हणून एक संघपणे या दहशतवादाचा मुकाबला करणे गरजेचे आहे . या हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्यावे लागनार आहे . दहशतवादी व त्यांच्या पाठीशी असणाऱ्या पाकिस्तानला यापुढे अशा स्वरूपाचे हल्ले होवू नयेत यासाठी चांगला धडा शिकवणे गरजेचे आहे . देशाचे प्रधानमंत्री तथा गृहमंत्री सक्षम असून दहशतवाद्याला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत यात शंका नाही . महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे . असे पत्रकारांशी बोलताना श्री बिराजदार यांनी मत व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here