उमरगा : ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र गौरव रथयात्रा’ उमरगा चौरस्त्यावर मंगळवारी (ता.२९) रोजी दाखल झाली असता, यात्रेचे मुख्य समन्वयक शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा व त्यांच्या समवेत असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश दाजी बिराजदार यांनी सत्कार केल . यात्रेचे पारंपारीक वाद्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले . कवठा येथील तेरणा नदीचे जलपूजन करून यात्रेच्या कलशात अर्पण करण्यात आले . पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . या स्वागत सोहळ्याला युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई पावशेरे ,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवाजी बनकर, किशोर साठे, विजय लोमटे ,जालिंदर कोकणे, दत्ता इंगळे, बाळासाहेब स्वामी ,यांची प्रमुख उपस्थिती होती . रथयात्रा मुख्य समन्वयक शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बोलताना सांगितले की, “ही रथयात्रा केवळ एक राजकीय उपक्रम नसून ती महाराष्ट्राच्या शौर्य, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. यातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करणे, सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही यात्रा सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करत आहे.” तर सुरेश बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा व अभिमानास्पद इतिहास देशासमोर मांडण्यासाठी ही रथयात्रा एक प्रभावी माध्यम ठरत आहे. ‘गौरवशाली महाराष्ट्र’ ही संकल्पना फक्त शब्दांत न राहता कृतीत उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव पुढे असतो. उमरगा लोहारा येथील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून समाधान वाटते. हा महाराष्ट्राचा गौरव सर्वदूर पोहोचवणारा उपक्रम ठरेल.” असे मत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे यांनी केले, सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी केले. शमशोद्दीन जमादार ,रफिक पटेल ,प्रशांत सोमवंशी ,वैजिनाथ कागे, नेताजी कवठे ,सुभाष गायकवाड , संजय जाधव ,प्रताप महाराज ,शंतनू सगर ,सुशील दळगडे, मोहन शिंदे ,रणजीत गायकवाड, विलास जाधव ,नंदू जगदाळे, फैयाज पठाण,कृष्णा मदनसुरे ,विजय पाटील, अभय पाटील ,हाजी सय्यद , अयुब पटेल ,,लखन बोडवे,माधव नांगरे,बाळू फरताळे , अनंत पाटील ,बाबा कुरेशी ,रणजीत बिराजदार ,मोहन जाधव, प्रदीप गावकरे, मालाजी काळे, बालाजी साळुंखे, अल्ताफ पटेल, विजय पाटील, खंडू काळे, भरत बिराजदार ,यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभावितकारी कार्यकर्ते उपस्थित होते .