कामगार हे राज्याच्या विकासाचे खरे शिल्पकार — प्राचार्य डॉ संजय अस्वले

0
48

 

उमरगा :- कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करताना सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांच्यात अप्रत्यक्ष संबंध आहे याची प्रचिती येते.कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांचा थेट इतिहास वेगळा असला, तरी सामाजिक व औद्योगिक दृष्टिकोनातून ते एकमेकांचे पूरक आहेत. कामगार वर्गाशिवाय महाराष्ट्राच्या प्रगतीची कल्पनाच अशक्य आहे. त्यामुळे एकाचा सन्मान (कामगार दिन) आणि दुसऱ्याचा गौरव (महाराष्ट्र दिन) एकत्र येणे हे अत्यंत अर्थपूर्ण आहे.

कामगार हे राज्याच्या विकासाचे खरे शिल्पकार आहेत, ही भावना महाराष्ट्र दिनाच्या उत्सवात निर्माण होते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त डॉक्टर अस्वले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि शुभेच्छा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या काळात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारखी शहरे औद्योगिक केंद्रे होती. या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग निर्माण झाला.कामगारांचे हित जोपासणे हे महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे महत्त्वाचे अंग बनले. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख एका कामगारहितैषी राज्य म्हणून झाली आहे. कामगार चळवळींमुळे समाजात हक्कांची जाणीव, संघटनाशक्ती आणि संघर्षशीलता वाढली. ह्या चळवळींनी राजकीय दबाव निर्माण करून समाजातील मागास घटकांचे प्रतिनिधित्व वाढवले, जे महाराष्ट्राच्या सामाजिक धोरणांवर प्रभाव टाकणारे ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापनेनंतर कामगार कल्याण, सुरक्षा, वेतन, आणि सामाजिक हमी यांसाठी अनेक धोरणे राबवली. म्हणजेच, कामगार चळवळींनी प्रेरणा दिलेली राज्यधोरणे महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेनंतर अधिक प्रभावी झाली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी ए पिटले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here