औसा:- विधानसभा मतदारसंघातील बेलकुंड – चिंचोली सोन भागातील 247.59 हेक्टर क्षेत्रावर, दि.7 मार्च, 2025 पासून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे प्रकरण 6 लागू करून बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसी अस्तित्वात आणली गेली, पण त्यात भूसंपादन Pass-through पद्धतीने करण्याच्या अटीचा समावेश करण्यात आला होता. एमआयडीसीशी संबंधित तज्ञांशी चर्चा करून बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीचे भूसंपादन Pass-through ऐवजी एमआयडीसी प्रचलित भूसंपादन प्रणालीनुसार करण्यात यावे अशी मागणी आ. अभिमन्यु पवार यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे केली होती. बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीची उपयुक्तता विचारात घेऊन भूसंपादन Pass-through ऐवजी एमआयडीसी प्रचलित भूसंपादन प्रणालीनुसार करण्यासंदर्भातील शासकीय आदेश आज निर्गमित केले आहेत. बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीला लातूर जिल्ह्यातील सर्वात रोजगारक्षम एमआयडीसी म्हणून नावारूपास आणण्यासाठी अगदी लहानातील लहान बाबीकडे सुद्धा गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदयजी सामंत व लातूरचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.