महादेव पाटील यांना पुणे येथील शिवयोगी प्रतिष्ठान चा बसव प्रेरणा पुरस्कार

0
26

 

उमरगा :- धर्माधारीत जातव्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेला छेद देत लोकशाहीची मूल्ये रूजविणारे लोकशाहीचे खरे जनक बसवण्णा असल्याचे मत लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शरण विजयकुमार शेटे यांनी व्यक्त केले. धानोरीतील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महात्मा बसवण्णा यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात “जागतिक लोकशाही मूल्य आणि महात्मा बसवेश्वर” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रतिष्ठाणच्यावतीने जयंतीनिमित्त स्वछतादूत महिला भगिनींचा सन्मान, पुरस्कार वितरण व व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वजारोहन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा बसवण्णा यांच्या वचनावर डॉ. लक्ष्मी बालराजू यांनी भरतनाटयाचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वडगावशेरी येथील वीरशैव सेवा मंडळाचे मल्लिकार्जुन सर्जे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे-जाधव, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, संजय ढोले, मल्लिकार्जुन मुलगे, जगदीश देशपांडे, डॉ. अविनाश नल्ले, ऍड. संदेश तोंडारे, शशिआण्णा टिंगरे, प्रकाश डीघोळे, शांताराम खलसे,शैलेश राजगुरू, पत्रकार उदय पवार, शशिकांत साटोटे, लिंगायत चळवळीत कार्य करणारे पुणे-पिंपरी-चिंचवड भागातील कार्यकर्ते त्याचबरोबर धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव, टिंगरेनगर, कळस परिसरातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  धानोरी परिसरात घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या ‘कचरावेचक स्वच्छतादूत’ महिला भगिनींचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसवण्णांच्या विचारानुसार प्रेरित होऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘बसवप्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.  बसव प्रेरणा पुरस्काराने किरण कोरे (समुपदेशन), आनंद देशेट्टे (शैक्षणिक), हणमंत शंके ( वचन साहित्य प्रसारक), महादेव पाटील (राजकीय लिंगायत अभ्यासक व पत्रकार ),सिद्धेश मुडके (युवा उद्योजक), रवींद्र हाळे (सामाजिक), बाळासाहेब धुपे-पाटील (वचन साहित्य प्रसारक),राजेंद्र वांजुळे (सामाजिक), अशोक काकडे(पत्रकार), यश चौहान (समाजसेवा), राहुल जाधव(सामाजिक कार्य), डॉ. लक्ष्मी बालराजू (कलाक्षेत्र/भरतनाट्य) या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव हंचनाळ, योगेश जोगदंड, अरुण बिराजदार, किशोर काळे, श्रीकांत बिराजदार, संदीप हत्तुरे, संतोष त्रिगुळे, सुशील देटे, विशाल रेड्डी, निलेश तारू, संभाजी जाधव, पांडुरंग भोसले, अभिषेक रेवुर यांच्यासह श्री गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील समाने व पत्रकार प्रकाश बिराजदार यांनी केले. नरेंद्र बिडवे यांनी प्रास्ताविक तर गुरुनाथ बिराजदार यांनी आभारप्रदर्शन केले.     ते पुढे म्हणाले की, अनुभव मंटपाच्या माध्यमातून बसवण्णांनी ७७० शरण आणी १ लाख ९६ हजार जंगम या सर्वांना अनुभावमूर्ती बनविले. अनुभाव म्हणजे स्वानुभावातून जो ज्ञान अर्जित करतो अशा लोकांना अनुभावमूर्ती बनवून समाजातील जातव्यवस्था नष्ट केली. मंगळवेढ्यातील दलितवस्ती मधून जात असताना बसवण्णा यांना नागदेव कांबळे यांच्या घरातून शिवनामाचा आवाज आला. त्या घरात जाऊन त्यांनी प्रसाद ग्रहण केला. त्यावेळी बसवण्णांनी धर्म भ्रष्ट केल्याचा तांडव धर्ममार्तंडांनी निर्माण केला. अशावेळी राजदरबारात त्यांना प्रवेशबंदी केली गेली. त्याच राजदरबारापर्यंत जातांना बसवण्णा पायी चालत होते. मात्र त्यांनी पालखीमध्ये मात्र नागदेव कांबळे यांना बसवले. ही समतेची वागणूक एका दलिताला देत त्यांनी धर्ममार्तंडांना मानवतेचा धडा दिला. शिवसंस्कृतीवर प्रेम करणारे अस्पृश्य नसून उच-नीच सर्व एक असल्याचा त्यांनी यावेळी निर्वाळा दिला. त्यामुळे १२ व्या शतकातले बसवण्णा हे लोकाभिमुख समाजव्यवस्थेचे अग्रणी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here