उमरगा : मागील वर्षी बलसुर प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली असून दिड वर्षापासुन भूमी अभिलेख कार्यालयाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे बलसुर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोजनी प्रस्ताव अडगळीला पडला आहे . ग्रामपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा ,फोन करूनही भूमी अभिलेख कार्यालयाने वेळ काढू पणाची भूमिका घेतली होती . प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम त्वरीत करून द्यावे, तसेच तालुक्यातील सामान्य नागरिकांचे कामे लवकरात लवकर करून देण्यात यावी . सतत कामावर गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . यासाठी दि .१३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार बलसुर ग्रामपंचायत व परिसरातील गावातील नागरीक उपस्थित होते .बलसुर येथे २४ / ११ /२३ ला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे . येथील गायरान जमिनीवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोजणीचा प्रस्ताव भूमी अभिलेख कार्यालयास २० / ०१ / २४ रोजी दाखल करण्यात आला होता . याला साधारण दीड वर्ष लोटला असतानाही कार्यालयाने कुठलीही कार्यवाही केली नाही . विशेष म्हणजे या दरम्यान तहसील कार्यालयाने दिनांक ११ /७ / २४ व दिनांक १४ / १०/२४ भूमी अभिलेख कार्यालयाला स्मरणपत्र पाठवली आहेत . भूमी अभिलेख कार्यालयाच्या या दिरंगाई मुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होऊनही स्थानिक व परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे . याला जबाबदार कोण असा सवाल करत प्रा . बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली बलसुर व परिसरातील गावातील नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयात ठिया दिला . यावेळी नागरिकांनी अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन करत निषेध व्यक्त केला . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी ,माजी पंचायत समिती सदस्य अभय माने ,सरपंच आयुब पटेल ,माधव नांगरे ,संदिपान पाटील, लक्ष्मण कोकाटे, महेश मोरे, राजेंद्र भोसले, अशोक सुरवसे, अभय जाधव, मनोज बनसोडे ,व्यंकट बनसोडे, सतीश उंडरगावे, वैभव बनसोडे, आनंद कांबळे ,संतोष चव्हाण ,नाना शिंदे, कृष्णा मदनसुरे ,अमोल कोंडे आत्माराम स्वामी, राजेंद्र वाघमारे ,सुरेश वाकडे आदींसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते .लोकनेते सुरेश दाजी बिराजदार यांनी या भागासाठी मोठ्या संघर्षातून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते . पण ते इतर ठिकाणी वर्ग करण्यात आले . आता परत अनेक वर्षांच्या संघर्षानंतर बलसुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेण्यात आलेले असताना . मागील दीड वर्षापासून भूमी अभिलेख कार्यालयात प्रस्ताव धूळ खात पडला आहे . शासकीय कामासाठीच ही कार्यालय अनास्था दर्शवत असेल तर सामान्य नागरिकांना काय न्याय देत असेल . त्वरित मोजणी करून आवश्यक ती कागदपत्रे या कार्यालयाने न दिल्यास बलसुर व परिसरातील गावांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल
– सत्यनारायण जाधव , बलसुर
भूमी अभिलेख कार्यालय शासकीय व जनतेच्या सार्वजनिक कामासाठी कारण नसताना असावर्षानु वर्ष वेळ काढू पणा करत असेल तर सामान्य नागरिकांच्या कामाची काय अवस्था होत असेल . ग्रामपंचायतीच्या वतीने साधारण दीड वर्षांपूर्वी भूमि अभिलेख कार्यालयाकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणासाठी मोजणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . लोकप्रतिनिधी म्हणून मागील अनेक वर्षापासून या परिसरातील आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सातत्याने संघर्ष करत आहोत . या संघर्षाला यश आले असून फक्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे हे लोक उपयोगी काम थांबले आहे .संबंधित अधिकारी कार्यालयात काही ना काही कारण सांगून गैरहजर असल्याच्या तक्रारी येत आहेत . तालुक्यातील शेतकरी सामान्य नागरिकांना या कार्यालयात न्याय मिळत नाही . कार्यालयाची दिरंगाई याच्यांबाबत वरिष्ठांना तक्रार करणार आहे . यापुढे सामान्य नागरिकाला त्रास झाल्यास कठोर भूमिका घेऊ . – प्रा . सुरेश बिराजदार ( प्रदेश उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )