धाराशिव:- महसूल प्रशासन हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून,प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या सेवा वेळेत आणि अचूक पद्धतीने पुरवणे ही जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे.त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध महसूलविषयक बाबींचा आढावा आयोजित बैठकीत घेतांना त्यांनी दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, संतोष राऊत,प्रविण धरमकर,भुम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, संबंधित नायब तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी .पुजार यांनी सांगितले की,महसूल प्रशासन हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून, प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या सेवा वेळेत आणि अचूक पद्धतीने पुरवणे ही जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करावे,असे ते म्हणाले.बैठकीत ॲग्रीस्टॅक,पवनचक्की व सौरऊर्जा,दंडणिय प्रकरणे,नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप,ई-केवायसी शेतकरी आत्महत्या प्रकरणे, ई-फेरफार,ई-चावडी,डी.एस.डी.डाटा साईन न झालेल्या ७/१२ चा अहवाल,ई-हक्क प्रणाली,ओडीसी अहवाल,जीवंत सातबारा मोहिम, कलम १५५ आदेश,शेतरस्ते, अर्धन्यायिक प्रकरणे,दहन-दफन भूमी आदी बाबींचे प्रकरणे निकाली काढण्याबाबत विशेष चर्चा झाली. जिल्ह्यातील अनेक फेरफार प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,फेरफारांची विलंबित नोंदणीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि हे सहन केले जाणार नाही.असे ते म्हणाले.पुजार यांनी पुढे सांगितले की, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ चे कलम ५४ ची प्रकरणे,संजय गांधी निराधार योजना,आस्थापना विषयक बाबी,आलेप विषयकबाबी,आपले सरकार पोर्टल/पी.जी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी,वसुली,गौण खनिज, भूसंपादन समन्वय विषयक बाबी, भुसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके,मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पवनऊर्जा,प्रकल्पासाठी औद्योगिक प्रयोजनासाठी सनद देणे कामी प्रलंबित प्रकरणांची संख्या, अकृषिक वापर आकारणी व सनद, ई-ऑफिस आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.या बैठकीत जिल्हाधिकारी .पुजार यांनी महसूल विभागाच्या प्रत्येक कामाचा सूक्ष्म आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.महसूल प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान,पारदर्शकता,वेळेचे व्यवस्थापन आणि जनतेशी सुसंवाद या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. नागरिकांना सेवा पुरवताना कोणतीही दिरंगाई होणार नाही,याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Home ताज्या बातम्या महसुलविषयक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यक्षमतेने काम करा — जिल्हाधिकारी किर्ती किरण...