प्रत्येक मनुष्यमात्रात बुद्धबीज वेळोवेळी फक्त त्याची निगा व संवर्धन गरजेचे’ — धम्मचारी ज्ञानपालित

0
49

 

लोहारा  :- त्रिरत्न बौद्ध महासंघ धाराशिव-लातूर यांचे संयुक्त विद्यमाने विक्रमनगर, लातूर येथे आयोजित धम्मशिबीरात बुद्ध ,धम्म, संघ या त्रिरत्नावर दररोज सायंकाळी प्रवचन मालीका होती.त्यातील ‘बुद्ध’ रत्नावर बोलताना धम्मचारी ज्ञानपालित पुढे म्हणाले,बुद्ध हे एक अलौकिक रत्न आहे.युवराज सिद्धार्थ आपल्या स्व प्रयत्नाने बुद्ध झाले.त्यांनी स्वतः चे घर,पत्नी ,मुलगा, राज्य ,पद, प्रतिष्ठा, संपत्ती याचा सहज त्याग केला. आसक्ती, आश्रवमुक्ती मिळवली. त्यांना अस्तित्वाचे सत्यदर्शन झाले. हे करत असताना त्यांना कठोर तपश्चर्या केली. मानसिक स्तरावर ‘मारविजय’ मिळवला. मच्चूमार, स्कंधमार, क्लेशमार आणि देवपुत्तमार यांचे विवेचन करुन त्यावर कासा विजय मिळवला हे सर्वांना समजेल अशा भाषेत विवेचन केले. व्यक्तीविकासासाठी बुद्ध एक दैदिप्यमान आदर्श असल्याचे सांगून त्यांच्या मार्गावर चालून एक आचरणशिल बौद्ध बनण्याचे आवाहन केले. अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत गोष्टींच्या माध्यमातून बुद्ध सांगितले. दि 9 ते13 मे 2025 या काळात हे धम्मशिबीर संपन्न झाले. याचे नेतृत्व धम्मचारी संघभद्र, पुणे यांनी केले. धम्मचारी कल्याणदस्सि, रत्नपालित,विबोध, अनोमरत्न, धम्मभूषण, जिनोदय, बोधीछंद, धम्ममित्र मनोज सुर्यवंशी, संकेत बनसोडे, हरिदास कांबळे, महादेव भोसले, संगिता सावंत, तेजस्वीनी गायकवाड ,जयद्रथ शिंदे, अशोक कांबळे यांनी पुढाकार घेतला. पुणे, धाराशिव, लातूर, उमरगा, संभाजीनगर, ठिकाणाहून शिबीरार्थी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here