लोहारा :- भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याने भारतीय सैन्याचे शौर्याच्या समर्थनार्थ व त्यांचे मनोबल वाढण्याकरिता देशभरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुरूम शहरात शहरातील तमाम देशभक्ताच्या वतीने रविवारी दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 वाजता भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथून रॅलीची सुरुवात करून किसान चौक, हनुमान चौक ,अशोक चौक, महात्मा बसेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत माता की जय, अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सैन्याच्या समर्थनात घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. रॅलीत प्रत्येकाने आपल्या हातात तिरंगा घेत आपल्या देशाची एकता दाखवून देत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा व सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅली नियोजन भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनीयार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते रॅलीत माजी सैनिक व्यंकट चौधरी, राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, देविदास व्हनाळे, शिवशरण वरनाळे, प्राध्यापक दत्तात्रय इंगळे, शरणाप्पा मुदकण्णा, आनंदनगर सरपंच अनिता जाधव,गुलाब डोंगरे,राहुल वाघ, भगत माळी,मनीष मुदकण्णा, अमृत वरनाळे, लखन बोंडवे, डॉ, खाजालाल ढोबळे,अरविंद फुगटे यांच्यासह शहरातील सर्वच माजी सैनिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीसाठी सुनील निलवडे, सिद्धलिंग हिरेमठ, आकाश क्षीरसागर, महेश धुमुरे, बाबुराव बेगमपुरे, सुरेश गायकवाड, अदींनी परिश्रम घेतले.