अरुंद शेत रस्ते होणार 12 फुटांचे ६० वर्षानंतर महायुती सरकारचा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय, रस्त्यांची ७/१२ वरही नोंद होणार — भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर

0
87

लोहारा :– महाराष्ट्राचा आधुनिक शेती व वाढत्या यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागाने अतिशय क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगीतली. बांधावरून जाणारे सध्याचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते आधुनिक कृषी अवजारांची ये – जा सुलभ व्हावी, तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा यासाठी ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूट करण्यात येणार आहेत. पारंपरिक शेत रस्ता बांधणीच्या १९६६ च्या निर्णयानंतर प्रथमच म्हणजे, सुमारे ६० वर्षांनी महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीसाठी हा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी हिताची पायाभरणी होत असून, सर्वंकष सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय धडाकेबाज व कार्यक्षम महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या ७/१२मध्ये होईल. हे शेतरस्ते जलदगतीने पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याबाबत शासन आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती व उत्पन्नवाढीसाठी या निर्णयाचा नक्की लाभ होईल. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणाचा समृद्ध वारशाची परंपरा महायुती सरकार पुढे नेत आहे, असे सांगुन भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित (दादा), महसुल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, महायुती सरकारचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here