लोहारा :– परंडा तालुक्यात सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे फळबागा, पशुधन व शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकार्यांना योग्य ती मदत करावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद बप्पा रगडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, किसान मोर्चा तालुका सरचिटणिस शिवाजी पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाडूळे, खासगाव चे माजी सरपंच नागेश शिंदे, रामदास गुडे, किरण कवटे, सोशल मीडिया संयोजक जयंत सायकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या परंडा तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेती, पिकांचे, पशुधनाचे, फळबागांचे तात्काळ पंचनामे करा...