उमरगा :- “थोर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाप्रती असलेले तेजस्वी विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुणांनी हाती घेतली पाहीजे” असे प्रतिपादन भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी केले. दि. 28 मे रोजी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142 वी जयंती उमरगा येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवा नेते शरण पाटील यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे शिवसेनेच्या युवा नेत्या ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले या होत्या, तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ नेते रामकृष्णपंत खरोसेकर यांची होती. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन तुकाराम चिंचणीकर, पंढरपूर हे लाभले होते, तसेच डॅा.कपील महाजन, जेष्ठ नेते मुरलीधरराव मुगळीकर, मनोज जोशी, लातूर, सचिन पाटील, योगेश राठोड, अनिल उर्फ पप्पु सगर, महेश माशाळकर,विक्रम म्हस्के, परमेश्वर टोपगे,संतोष कार्लेकर, सतीश पाटील, कपील सास्तुरकर, भालचंद्र कुलकर्णी,राम सोलनकर ,एस.जी.कुलकर्णी ,शकुंतला खरोसेकर,धोंडदेव ताई, कार्लेकर ताई व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख वक्ते तुकाराम चिंचणीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध पैलू वर सखोल असे मार्गदर्शन केले, तर ॲड.आकांक्षा चौगुले यांनी आज वीर सावरकरांचे विचार अत्यंत गरजेचे आहेत असे आवर्जुन नमुद केले व त्यासाठी त्यांनी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्तींचा दाखलाही दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना युवा नेते शरण पाटील पुढे म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त विशिष्ट जाती धर्माचे नसून ते संपूर्ण भारतवासीयांचे आधारस्तंभ आहेत, आज त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे असे त्यांनी आवर्जुन नमुद केले. ज्यांनी सावरकरांवर टीकाटिप्पणी केली त्यांचेच पुर्वज स्व.पंडित जवाहरलाल नेहरू व स्व.इंदिरा गांधी यांनी देखील वि.दा.सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल विशेष कौतुक केल्याची आठवण त्यांनी करून दिली. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत सावरकरांचे विचार रुजवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, पुढील वर्षी आपण सर्वजण मिळुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती निश्चितपणे मोठ्या प्रमाणात साजरी करू अशी ग्वाही उपस्थित सावरकरप्रेमींना दिली. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे जेष्ठ नेते सुनील कुलकर्णी, सूत्रसंचालन प्रा.राजीव जोशी यांनी केले, तर आभार पंकज खरोसेकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, उमरगा च्या सर्व पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.