धाराशिव:- जिल्ह्यात दिनांक ७ जून २०२५ रोजी बकरी ईद (ईद-उल-अझहा) सण साजरा करण्यात येणार आहे.हा सण शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी महत्त्वपूर्ण एक आदेश जारी केला आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ७ जून २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल व अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द केली जाऊ शकते, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.