लोहारा:– पर्यावरण रक्षण,वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केले. लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था लोहारा येथे निवडश्रेणीच्या प्रशिक्षणार्थी वर्गाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य वृक्षोरापन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन तेबोलत होते. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून पतसंस्थेचे चेअरमन सुदर्शन जावळे, व्हा.चेअरमन श्रीशैल जट्टे, सचिव बाबासाहेब कदम, केंद्रप्रमुख तथा प्रशिक्षण प्रमुख व्हि.एस.चंदनशिवे, संचालक विकास घोडके, सुर्यकांत पांढरे, प्रविण शिंदे, सुधीर घोडके, गजानन मक्तेदार, रफीक शेख, जनार्धन काठमाडे, अदि उपस्थित होते. यावेळी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून के.एस. गायकवाड, दाजीबा साबळे, दत्तात्रय लादे, शबाना शेख यांनी काम पाहिले. पर्यावरणाचा मित्र बनू या, एक वृक्ष लावू या, एक वृक्ष भविष्यासाठी, मी पर्यावरणाच काही तरी देण लागतो या भावनेतून निवडश्रेणी प्रशिक्षणार्थाच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड अध्यक्ष व मान्यवर, सर्व संचालक मंडळ व 22 प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुर्यकांत पांढरे, विश्वजीत चंदनशिवे यांनीही विचार मांडले. गटशिक्षणाधिकारी बिराजदार यांनी मार्गदर्शन करताना शिवराज्याभिषकादिवशी आपण वृक्षारोपण कार्यक्रम केलात हा यापेक्षा सुंदर योग नाही. आपण सर्वांनी वृक्षाचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी घ्यावी.पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी मोलाची भुमिका बजवावी.पर्यावरण रक्षण,वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात कात झटकून झोकून देवून कार्य करावे असे सांगितले. यावेळी कै.मदन कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरेखा महाजन यांच्या तर्फे एक वृक्ष लावण्यात आले. यावेळी व्यंकट पोतदार, गुलाब माने, रामकृष्ण बिराजदार, बालाजी साळुंके, सुधीर गुरव, केशव राठोड, सुभाष इंगळे, एकनाथ शिंदे, महादेव गायकवाड, श्रीशैल धरणे, एकनाथ कदम, तात्याराव भालेराव, कोंडीबा कारभारी, प्रशांत शिंदे, रामराव क्षीरसागर, संतोषकुमार भोसले, संजीव भोसले श्रीम.निर्मला दंतकाळे, सुरेखा महाजन, सुलोचना बोळशेट्टी, महानंदा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकट पोतदार यांनी केले तर आभार एकनाथ कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र कोकणे, किरण दासीमे अदिंनी परीश्रम घेवून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली.