लोहारा:– शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा जेणे करून उत्पन्नात वाढ होईल. यासाठी बी बी एफ यंत्राने पेरणी केल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न अधिक मिळू शकते त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे वळण्यापेक्षा जैविक शेतीकडे वळत विष मुक्त शेती करावे असे प्रतिपादन धाराशिव शासकीय कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. डिंगबर पेरके यांनी केले. विद्या विकास प्रतिष्ठानच्या मानव विकास केंद्राच्या वतीने लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महिला केंद्रात शेती विषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ.पेरके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महानंदा पनुरे (जेवळी) होत्या तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ.डिंगबर पेरके, प्राचार्य शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव, महेश क्षीरसागर (निवृत्त कृषी उप संचालक लातूर), उपसरपंच बस्वराज कारभारी (जेवळी), एस.डी.मारुंबळे (कृषी सहाय्यक जेवळी), ग्रामसेवक आर.एन. वाघमारे (जेवळी), ग्रामसेवक एस.डी.जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ.पेरके पुढे बोलताना म्हणाले कि, शेतकऱ्यांना उत्पन्न अधिक मिळवायचे असेल तर विषमुक्त शेती केली पाहिजे, यासाठी जैविक शेती केली पाहिजे यामध्ये गांडूळ निर्मिती शेणखत याचा वापर शेतकऱ्यांनी करावा उत्पन्न अधिक मिळवण्याच्या नादात शेतकरी रासायनिक महागडे औषधे फवारणी करतो परंतु यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहेत. पंजाब सारख्या राज्यात उत्पन्न अधिक मिळवण्यासाठी रासायनिक फवारणी प्रमाणा पेक्षा अधिक पिकांवर करतात. परंतु या रासायनिक फवारणीमुळे जमिनीची कस संपुष्टात येते विशेष म्हणजे या फवारणी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पंजाब हुन निघणारी रेल्वे हे कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखले जाते तेथील शेतकरी राजा रासायनिक शेतीच अवलंबत आहे तसे न करता शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळले पाहिजे तेव्हाच शेतकऱ्याचा खरा उद्धार होईल असे प्राचार्य डॉ.पेरके यांनी सांगितले. या प्रसंगी महेश क्षीरसागर (निवृत्त कृषी उपसंचालक लातूर), आर.एन.वाघमारे, एस.डी.मारुंबळे (कृषी सहाय्यक जेवळी) यांनी शेत शिवार, जमीनीची कस, पेरणी, फवारणी, पिकांची निगा व देखभाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानव विकास प्रतिष्ठानचे बाबुराव माळी यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार राजेंद्र माळी यांनी मानले. या कार्यक्रमास मानव विकास प्रतिष्ठानचे वसंत ठेले, दिपक पोतदार, सौ.मद्रास माळी, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर (लोहारा), राजू स्वामी, वसंत क्षीरसागर, राजेंद्र चौगुले, नागेश पनुरे, बाबुराव ढोबळे, सिद्रामप्पा सोळशे, अनंत माळी, दिपक माळी, नाना माळी, सुधाकर गुंजोटे, शिवाजी माळी, यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.