उमरगा येथे बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ रास्ता रोको

0
195

 

उमरगा :– दिव्यांग व विधवांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध 17 मागण्यांसाठी प्रहार अपंग संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी दि. ८ जुन रोजी पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी व विविध संघटनेच्या वतीने उमरगा येथील बाळासाहेब ठाकरे चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रचारात सरकारने दिलेला शब्द पाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा. दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान ५ लाख रुपये घरकुलासाठी द्यावेत व पेरणी ते कापणीच्या सर्व खर्च एमआईजीएस मार्फत करावा. या प्रमुख मागणीसह अन्य १७ मागण्यांसाठी ८ जूनपासून बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उमरगा तालुका येथे स्व.बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उमरगा तालुक्यातील दिव्यांग बांधवासह ,शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांनी आपल्या सहकार्य सह चोख बंदोबस्त ठेवला होता.वाहतूक काही कालावधीसाठी ठप्प झाली होती या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आ. प्रवीण स्वामी, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड ,अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, ईसाक शेख ,रामेश्वर मदने ,नागराज मसरे ,राहुल मन्नाडे ,नारायण भोसले यांच्या सहमोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here