‘संकल्प ते सिद्धी’ अभियानातून धाराशिव भाजपचा ‘जनता दरबार’ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

0
6

लोहारा:–  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, १५ जून रोजी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणी आणि समस्या थेट ऐकून त्यांचे शासकीय आणि पक्ष पातळीवर निराकरण करण्याचा भाजपचा मानस आहे. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या तालुक्यांमध्ये एकूण सहा ठिकाणी हे दरबार आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान २२८ लेखी तक्रारी आल्या होत्या तर याच वेळ आलेल्या अनेक तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला. घरकुल हप्त्यांचे थकबाकी प्रकरण, नळजोडणी, ग्रामपंचायतीशी संबंधित तक्रारी, वीज, रस्ते अशा स्थानिक स्वरूपाच्या अनेक समस्यांवर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तात्काळ निर्णय घेण्यात आले. काही बाबी पुढील कार्यवाहीसाठी नोंदवून घेतल्या गेल्या. या उपक्रमासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, जनतेने आता अडचणींसाठी तालुक्याच्या किंवा जिल्हा कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. भाजपा थेट गावात जाऊन प्रश्न समजून घेत आहे आणि तिथेच उपायही शोधत आहे. हाच आमचा ‘जनतेशी थेट संवाद’ ठेवण्याचा प्रयत्न आहे.या ठिकाणी घेण्यात आले जनता दरबार कळंब तालुक्यात ईटकुर येथे नेताजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दरबार झाला. शिराढोण येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत व दत्ता साळुंखे यांच्या संयोजनात जनता दरबार कार्यक्रम पार पडला. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे माजी जि.प. सभापती अ‍ॅड. दत्तात्रय देवळकर यांच्या उपस्थितीत व अनिल भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. कोंड येथे नितीन काळे यांच्या उपस्थितीत व निळकंठ पाटील यांच्या संयोजनात कार्यक्रम झाला. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे अ‍ॅड. खंडेराव चौरे यांच्या उपस्थितीत व महादेव जाधव यांच्या संयोजनात दरबार झाला, तर नांदगाव येथे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व रंजना राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या समस्या ऐकल्या घेतल्या. भाजपच्या या दरबारांमुळे गावागावातील सामान्य जनतेला आपल्या प्रश्नांसाठी थेट व्यासपीठ मिळाले असून, या उपक्रमातून ‘संकल्प ते सिद्धी’ हा उद्दिष्ट मार्गक्रमण करत असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here