उमरगा :– आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पर्यावरण आणि आपली जीवनशैली बदलत चालली आहे. त्यामुळे मानवी आजाराचे स्वरूपही बदलत असून, संसर्गजन्य रोगावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मात केली आहे. परंतु रासायनिक खतांचा वापर त्याचबरोबर पर्यावरणाची हानी यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजाराला सामोरे जाण्यासाठी योगा प्राणायाम आणि ध्यानधारणा ची गरज आहे. म्हणून तरुणांना सक्षम बनण्यासाठी योगा अभ्यासाचा सराव नियमित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन योग दिनाच्या समारोपप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय योग सेंटर, एनसीसी, एनएसएस विभागाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे योगशिक्षक डॉ जी एन सोमोशी सोमवंशी यांनी योगा प्राणायाम आणि ध्यानधारणा नियमित कशी करावी यासाठी प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन दिले.२१ जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव १७७ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस दीर्घ दिवस असतो. हा दिवस योगशास्त्रातही खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून दरवर्षी 21 जूनला योग दिन साजरा केला जातो महाविद्यालयात आयोजित या योग दिनानिमित उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ डी व्ही माने, डॉ पी एस माने, डॉ विनोद देवरकर, डॉ अशोक पदमपल्ले प्रा विजय पवार, डॉ राजू सूर्यवंशी, प्रा सुजित शिंदे, उमरगा पोलीस निरीक्षक रामहरी चाटे पोलीस कॉन्स्टेबल संगमेश्वर नाकाडे तसेच प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी करिअर कट्ट्याचे पोलीस अकॅडमी चे प्रशिक्षक तानाजी लेंडवे आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.