मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांचे ; आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले व तहसीलदारां यांना निवेदन

0
176

उमरगा :–  महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक- युवतींनी आपले मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, तहसीलदार गोविंद येरमे यांना सादर केले. या निवेदनात शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावे. तसेच नौकरी भरतीत मध्ये 10 टक्के आरक्षण किंवा १०% जागा राखीव ठेवण्यात यावे. व प्रशिक्षणार्थीचे मानधन वाढविण्यात यावे. महिन्याच्या 1 तारखेला प्रशिक्षणार्थी चे मानधन जमा करण्यात यावे. मुदतवाढ देण्यात आल्यानंतर बऱ्याच आस्थापना मध्ये प्रशिक्षणार्थीची फेरनिवड करण्यात आली नाही व ज्या प्रशिक्षणार्थीची फेरनिवड झाली आहे त्यांचे मानधन अद्याप पर्यंत भेटलेला नाही. ते तात्काळ मानधन देण्यात यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी, आजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, “मी हा मुद्दा विधानसभेत मांडेन आणि सरकारकडे पाठपुरावा करेन,” असे आश्वासन दिले. अनेक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळाले असले, तरी कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. प्रशिक्षणार्थी आता सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले की महायुती सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षणार्थीचा प्रश्नांबाबत मी सरकारकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले व तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे मी पत्रव्यवहार करून प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पुढे प्रशिक्षणार्थीनी बोलता म्हणाले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ११ महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी आपल्या भवितव्यासाठी सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. आम्ही प्रशिक्षण पूर्ण केला नंतर, पुन्हा नोकरीची हमी नाही. सरकारने आमच्या भवितव्याचा विचार करावा ” अशी विनंती सर्व प्रशिक्षणार्थीनी शासनाकडे केले आहे.यावेळी सुरज आबाचने, राम सुरवसे, अनिकेत औरादे, चेतन गायकवाड, राम कांबळे, नितीन जाधव, मोहसीन मुंगले, प्रदिप साळुंके, गोपाळ बलसूरे,राजश्री ऐकळे, जयश्री कोळी, अमृत मोरे, भाग्यश्री सुतार, सुनिल पाटील, क्रांती शिताळे, गिरीश पाटील, ऋषीकेश बिराजदार, आनंद तळबुगे, गिरीश पाटील, बळीराम हिफरगे, दत्ता इंगळे,आदी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here