उमरगा :– ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने तांदूळवाडी (वाशी, जि. धारािशव) येथे दिनांक २० जून २०२५ (शुक्रवार) रोजी घडलेल्या शेतकऱ्यांवरील अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन दि. 24 (मंगळवार) रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, लाठीचार्जच्या या घटनेने शेतकरी बांधवांच्या मूलभूत हक्कांचे आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन झाले आहे. तांदूळवाडी येथील शेतकरी पवन चक्की कंपनीच्या प्रकल्प विरोधात आपल्या जमिनी आणि उपजीविकेच्या रक्षणासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु, पोलिसांनी कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय आणि अकारण शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या लाठीचाजर्मध्ये अनेक शेतकरी जखमी झाले असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततामय आंदोलन करणे हा प्रत्येक नागिरकाचा घटनात्मक अिधकार आहे, आणि या अधिकारावर पोलिसांनी केलेला हल्ला हा अत्यंत निदनीय आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि असुरिक्षततेची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे. या लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे.” असे सांगत, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जखमी शेतकऱ्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा आणि नुकसानभरपाई द्यावी, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदनावर सत्यनारायण जाधव, ऍड.अर्चना जाधव, ऍड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, कविता साळी, व्यंकट भालेराव, प्रदीप चौधरी, किशोर औरादे, करीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.