आ.बबनराव लोणीकरांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  लोहाऱ्यात  ‘जोडेमारो आंदोलन’

0
5

 

लोहारा :– आ.बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या अत्यंत अपमानास्पद व घृणास्पद वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दि.27 जून रोजी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात “जोडेमारो आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, युवक, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्य सरकारमधील एका माजी मंत्र्याने केलेल्या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांच्या अस्मितेला धक्का बसला असून, त्याविरोधात आजचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनस्थळी आंदोलकांनी संबंधित भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा पुतळा उभारून त्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. “शेतकरी कोणाचाही याचक नाही, तो देशाचा अन्नदाता आहे”, जय जवान जय किसान, “शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना जनता रस्त्यावरच उत्तर देईल”, भाजप सरकारचा निषेध असो, बबनराव लोणीकर मुर्दाबाद, बबनरावांना निलंबित करा नाहीतर खुर्च्या खाली करा “जोडेमारो…!” अशा घोषणा देत संतप्त घोषणांनी संपूर्ण चौक दणाणून गेला. वक्तव्यांमध्ये म्हटले होते की – “मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले, त्याचा हिशोब दे!”, “तुझ्या अंगावरचे कपडे, पायातली चप्पल, हातातलं मोबाईल – हे सगळं आमच्यामुळे आहे!”, “आमचंच घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतोस!”, आणि “तुझ्या माईचा पगार, बापाचं पेन्शन, बहिणीला सवलती – सगळं आम्ही दिलं!” या वाक्यांमुळे संपूर्ण शेतकरी व महिलांचा अपमान झाला असल्याचा ठाम सूर आंदोलनात उमटला. आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की, अशा अपमानकारक वक्तव्यांबाबत संबंधितांनी राजीनामा द्यावा अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्या देखील मांडण्यात आल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा रक्कम तत्काळ वितरित करणे, वीजपंपांना २४ तास वीज देणे, तसेच पावसाने व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी एका आवाजात इशारा दिला की, “अन्नदात्याच्या अस्मितेशी खेळ करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. हे आंदोलन हा फक्त प्रारंभ आहे; गरज भासल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी बोलताना सांगितले की – “ज्या प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला, त्या शब्दांनी ग्रामीण समाजाच्या मनात आक्रोश निर्माण केला आहे. आम्ही या अन्यायाचा तीव्र निषेध करतो. अन्नदात्याचे मान सन्मान जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जर कोणी त्याच्या अस्मितेशी खेळ करत असेल, तर जनता अशा प्रत्येकाला धडा शिकवेल. या सरकारने कायमस्वरूपी शेतकऱ्यांची व महिलांचे फसवणूक केली आहे येणाऱ्या काळात शेतकरी व महिला यांना त्यांची जागा दाखवून देतील ” यावेळी आ.बबनराव लोणीकरांचा पुतळ्याला चपलांचा हार घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले व त्यांच्या प्रतिमेस जोडे मारली व चाबकांचे फटके शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले व शेवटी पुतळा जळण्यात आला व निषेध नोंदवण्यात आला.‌‌ यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शेतकरी नेते आयनुद्दीन सवार, शहर प्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, ज्येष्ठ नेते पंडित ढोणे, पंडित बारगळ, महेबूब गवंडी, युवा सेना शहरप्रमुख प्रेम लांडगे, सरपंच सचिन गोरे, उपसरपंच राहुल गरजे, महादेव पवार, दत्ता पाटील मार्डी,रघुवीर घोडके, ज्ञानेश्वर लोभे, अनिल मोरे, बळीराम गोरे, तुकाराम वाकळे, बालाजी जाधव, महादेव फत्तेपुरे, महादेव सूर्यवंशी, अमोल जाधव, शिवाजी मोरे, बाबासाहेब गुंजकर, चेतन गोरे, दत्ता पाटील, पांडुरंग सुरवसे, पप्पू जाधव, तुळशीदास शिंदे, गुलाब राठोड, सचिन जाधव, राजू स्वामी, संतोष जावळे, गोपाळ समदळे, महेश भरगांडे, योगेश आंबेकर, बाबासाहेब चव्हाण, जगन्नाथ गोरे, यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here