परंडा तालुक्यात पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला ; मयताच्या कुटुंबियाची जिल्हाधिकारी पुजार यांनी घेतली भेट

0
313

धाराशिव:–  परंडा तालुक्यातील मौजे हिंगणगाव (खुर्द) येथील विलास अंबादास गायकवाड (वय ५०) हे दि.२१ सप्टेंबर रोजी नळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.त्यांचा मृतदेह २५ सप्टेंबर रोजी सापडला. पोलिसांनी पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला.या घटनेनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी २७ सप्टेंबर रोजी मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी परंडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here