धाराशिव :- भारत देशातील विविध जाती धर्माच्या नागरिकांना ,विविध भाषीकांना,रुढीपरंपरा जपणा-यांना एकाच देशात एकसंघपणे ठेवणारे साधन हे फक्त भारतीय संविधानचं आहे असे मत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे सदस्य , संविधान संवाद समीतीचे महाराष्ट्र राज्य सदस्य तथा व्याख्याते प्रा.सुधीर कांबळे यांनी उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घर घर संविधान या कार्यक्रमात दि.५ डिसेंबर रोजी बोलताना व्यक्त केले.
सर्व प्रथम भारतीय संविधान प्रत देतानाचा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन घर घर संविधान कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते तथा पाठ्यपुस्तक महामंडळाचे सदस्य , संविधान संवाद समितीचे महाराष्ट्र राज्य सदस्य प्रा सुधीर कांबळे तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संतोष पाटील, मुख्याध्यापिका कल्पना अशोक गुंजोटे, , शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष उमेश सुरवसे पोलिस पाटील ईश्वर सुरवसे यांच्या हस्तेपुजन करून अभिवादन करण्यात करण्यात आले.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, या देशातील प्रत्येक जाती ,धर्माच्या नागरिकांना आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा पुर्ण मुलभुत अधिकार व हक्क भारतीय संविधानाने दिले आहे.असे ही ते म्हणाले.
या वेळी धाराशिव चे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी घोष यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात घर घर संविधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .त्या आनुषंगा पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना अशोक गुंजोटे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख व्याख्याते तथा संविधान संवाद समीतीचे राज्य सदस्य प्रा.सुधीर कांबळे ,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सुरवसे, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे, साळुंखे एस एल , इब्राहिम चौधरी, सत्यपाल भंडारे, शिवमुर्ती स्वामी, सर्व श्रीमती एम के गायकवाड, पी जी झिंगाडे, जे डी गोबाडे, एस एल आळणे, पी जी पाटील, ए यु सुरवसे,तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थिती होते.
या वेळी शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य प्रभावती रामचंद्र सुरवसे,पालक लक्ष्मन सुरवसे ,सचिन सुरवसे,यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमुर्ती स्वामी यांनी केले तर आभार सत्यपाल भंडारे यांनी मानले.