उमरगा :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी विशेष शिबिर १५ तारखेपासून जकेकुरवाडी येथे सुरू आहे. सहवा दिवस दिनांक २०/०१/२५ रोजी रासेयो जेकेपूर गावामध्ये बालविवाह निर्मूलन जनजागन रॅलीचे आयोजन करून . बालविवाहाचे दुष्परिणाम यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं बालविवाह निर्मूलनाची शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जकेकूरवाडी चे सरपंच श्री अमर सूर्यवंशी यांनी स्थान भूषवले. तर डॉ. पार्वती सावंत मॅडम यांनी वेळी बालविवाह निर्मूलनावर मार्गदर्शन केले. बालविवाह निर्मूलनावर पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले होते. लेझीम खेळत व घोषणा देत संपूर्ण गावामध्ये जनजागरण रॅली काढण्यात आली होती.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये गावच्या उपसरपंच सौ. सुनीता जगताप , प्रा.रेश्मा नितनवरे, प्रा.ज्योती जोळदाबके, प्रा.वसुंधरा निचत, प्रा.बिना लोकरे, आदी होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक श्री.प्रज्वल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन श्री सिध्दू झंपले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार श्री चैतन्य जाधव यांनी केले.