इकबाल मुल्ला
औसा :- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 आणि मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5 अंतर्गत लातूर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेली प्रकरणे निकाली काढून नकाशावरील/शेतकऱ्यांनी मागणी केलेले शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना शेतरस्ते निर्माण करून घेण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कालबद्ध आणि नियोजित कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आ. अभिमन्यु पवार यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहान आ.अभिमन्यु पवार यांनी केले आहे.