लोकमंगल कारखान्याचा गळीत हंगाम फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात बंद होणार; ऊसउत्पादकांनी बंद होण्यापूर्वीच मालक तोडकरुन ऊस आणावे –  भोगाडे 

0
270

 

इकबाल मुल्ला

लोहारा:-  लोकमंगल माऊली इं.लि.लोहारा (खु) या कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना कळविण्यात येते की, कारखान्याचा चालु गळीत हंगाम सन 2024 – 25 साठी ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे नोंदविलेल्या सर्व ऊसाचे गाळप जवळपास पुर्ण होत आलेले असुन कारखान्याचा चालु गळीत हंगाम फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्याच्या  दरम्यान बंद होणार आहे, तरी ज्या सभासद, बिगर सभासदांचा चालु गळीत हंगाम सन 2024 – 25 साठी नोंदविलेला ऊस अ‌द्याप गाळपाअभावी शिल्लक राहिलेला असेल अशा सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या ऊसाच्या गाळपाच्या कार्यवाहीसाठी कारखाना मुख्य शेती कार्यालय किंवा संबंधित विभागातील शेतकी कार्यालयाकडे संपर्क साधुन आपला ऊस गळीतास पाठविण्याची व्यवस्था करावी. ज्या ऊस उत्पादक शेतकरऱ्यांची ऊसाची तोड अ‌द्याप झालेली नाही, त्यांनी स्वत: मालक  तोड करुन सदरचा ऊस कारखाना बंद होण्यापुर्वी कारखान्याकडे गाळपास पाठवून द्यावा. सदर दिलेल्या मुदतीनंतर या उपरही कोणाचा नोंद केलेला ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिल्यास त्याची जबाबदारी या साखर कारखान्यावर राहणार नाही, याची सर्व संबंधित सभासद, बिगर सभासद व सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहान वरिष्ट सरव्यवस्थापक वरिष्ट सरव्यवस्थापक सी.एस.भोगाडे लोकमंगल माऊली इं.लि.लोहारा (खु) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here