पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा ; समाजसेवा हि ईश्वर सेवा —  शरण पाटील

0
117

 

 

उमरगा – गेल्या चाळीस वर्षा पासून सर्व सामान्य जनतेच्या पाठींब्या मुळेच पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा लाभली आहे. समाजसेवा हि ईश्वर सेवा आहे. सर्व सामान्यांची सेवे मुळे आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मिळते असे सांगून जनतेच्या आशिर्वादा मुळेच समाजसेवा करण्याला ताकद मिळते. सर्वसामान्यांच्या रुग्ण सेवेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. संपूर्ण आयुष्य समाजसेवे साठी समर्पित करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी केले.शरण पाटील फाऊंडेशनच्या वतीने चार व पाच मार्च रोजी येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील विविध आजारांच्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर , दिव्यांगाचे विविध साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले.या वेळी शरण पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील होते. श्रमजीवी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर , संचालक मल्लीनाथ दंडगे , कृऊबाचे सभापती बसवराज कस्तुरे , लातूर येथील संवेदना प्रकल्पाचे व्यकंट लामजणे, विठ्ठलसाई साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाणे, उमरगा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अमित भरडे, माजी सभापती मदन पाटील , सचिन पाटील, धनराज पाटील , प्राचार्य डॉ. आशोक सपाटे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड , दिलीप भालेराव प्रा. डॉ. शौकत पटेल सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले कि- पाटील परिवाराला गेल्या चाळीस वर्षापासून समाजसेवेची परंपरा लाभली आहे. समाजसेवेची लाभलेली परंपरा अखंडित

ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व सामान्य जनतेची सेवा केल्याने त्यांचे आशिर्वाद सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास देतात. वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजसेवा करण्याचा निर्धार केला आहे. श्रमजीवी , विठृलसाई , नगर शिक्षण विकास , उमरगा जनता बँक या परिवारा मुळेच समाजसेवेची प्रेरणा मिळाली आहे. गोरगरीब व सामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरण पाटील फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.आगामी काळात विविध आजारांच्या रुग्णांना फाऊडेशनच्या माध्यमातून वैद्यकिय आधार देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी फाऊंडेशन तत्पर रहाणार आहे. पाटील परिवाराला लाभलेली समाजसेवेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.समाजसेवा हा राजकारणाचा पाया आहे. समाजसेवेतून प्रत्येक माणसांची मने जिंकता येतात . समाजकार्य हे अनंत काळासाठी अमर रहाते. माणसा माणसांच्या मनामनातील वाढत चाललेले अंतर जवळ आणण्यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याचे मत विनायकराव पाटील यांनी व्यक्त केले . रामकृष्णपंत खरोसेकर , प्राचार्य डॉ. दिलीप गरुड , प्राचार्य आशोक सपाटे , प्रा. डॉ. शौकत पटेल , व्यकंट लामजणे ,यांनी शरण पाटील फाऊंडेशनच्या कार्याचे या वेळी कौतुक केले.या वेळी ३०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्रवणयंत्र, व्हील चेअर , द्राय सायकल , मोटार राईज द्राय सायकल , वॉक्स , अंधकाटी ३३५ दिव्यांग लाभार्थीना या साहित्याचे वाटप करण्यात आले. महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड, चंद्रशेखर पवार, रफिक तांबोळी, सचिन पाटील, राहुल हेबळे , राजू मुल्ला , अनिल पपू सगर , पंकज खरोसेकर , विक्रम मस्के, आकाश पाटील, सुजीत शेळके , आदि सह शरण पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम पेठकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले. आभार पंकज खरोसेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here