धाराशिव :- जिल्ह्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र व तेलंगणा राज्याच्या राज्य सिमे जवळील तिर्थक्षेत्र असून या क्षेत्राला वैभव मिळवून देत येथे येणाऱ्या हजारो भक्तांना सुख सोयी उपलब्ध करून देण्याचा मानस धाराशिव चे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केला आहे.ते श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे पर्यटण विकास पाहणी करण्यासाठी व दर्शनासाठी आले होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रकाश आष्टे हे उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना पुजार बोलत होते की, अचलबेट देवस्थान हे सिमावर्ती भागातील हजारो भावीकांचे श्रध्दास्थान आहे. या क्षेत्राचा विकास हा भावीकांच्या सोयीसाठी करीत आणखी सोयी सुविधांची उपलब्धता करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ते म्हणाले. भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज पर्यंत तब्बल 11 कोटी रुपयांची कामे प्रकाश आष्टे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेली आहेत. उर्वरित कामे चालू आहेत. हे सांगितल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक केले. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून अजून निधी उपलब्ध व्हावा याकरिता देवस्थान च्या विविध विकासासाठी जिल्हा परिषद चे माजी सदस्य तथा गटनेते प्रकाश आष्टे यांना सविस्तर माहिती दिली. या ठिकाणी भाविकांची संख्या पाहता राहण्यासाठी खोल्या, भक्त निवास, भोजनालय, विविध ठिकाणी बांधकाम, अचलबेट देवस्थान डोंगर पायथ्याशी गोल रस्ता या सर्वांची पाहणी केली. हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांच्या सोबत चर्चा करताना या ठिकाणी दर वर्षी श्रावण महिन्यात अखंड पारायण, हरीपाठ, दररोज किर्तन, दर महिन्याच्या पौर्णिमेला किर्तन, दत्त जयंती निमित्त सात दिवस विविध कार्यक्रम व किर्तन तसेच सप्ताह, लाखो सदभक्त दर्शन व कीर्तन श्रवणासाठी येतात. दररोज व विविध कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण करण्यात येते. यांची सविस्तर माहिती घेत विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. हभप. भिम महाराज, संजय राठोड, नरसिंग लवटे, बंडू नेलवाडे, बाळू पाटील, विठ्ठल दामोदरे, अशोक कारभारी जाधव, मुरलीधर बिराजदार, प.स.चे माजी सभापती युवराज जाधव, पञकार लक्ष्मण पवार, भैरवनाथ लेंढवे कुन्हाळी, माधव मोरे, दत्ता हिरवे, अमर शिंदे, गणेश गबूरे, अप्पाराव रामतीर्थे, ईश्वर माळी, संदीप माळी, राजू माळी, मोहन मोरे, कृष्णा लवटे, दयानंद पाटील, सुभाष हिरवे, व्यंकट तेलंग, भास्कर राठोड, दिगंबर लवटे, सुधाकर गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.