महाबोधी बुद्ध विहार ताब्यात द्या…भारतीय बौध्द महासभेचे आंदोलन
उमरगा / प्रतिनिधी – भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ता. 7 रोजी आंदोलन करण्यात आले. प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदारामार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बोधगया येथे गेल्या १५ दिवसापासुन बौध्द भिख्खू व बौध्द समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे. हिंदुच्या मंदीरांची देखभाल करण्यासाठी हिंदुचेच लोक असतात, मुस्लीमांच्या मस्जीदीची देखभाल मुस्लीम समाजच करीत असतात, जैन मंदीरांची देखभाल जैन लोकच करीत असतात. त्याच अनुषंगाने महाकारूणी तथागत गौतम बुध्द यांना ज्ञानप्राप्त झालेल्या गया येथे असलेले महाबोधी महाविहार बौध्दांच्यांच हातात का असु नये जगभरातील व देशातील सर्व बौध्द बांधवांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला असुन भगवान गौतम बुध्दांचा त्याठिकाणी ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असुन हे समस्त बौध्द धर्मियांच्या भावना दुखविण्याचे काम त्याठिकाणी चालु आहे.
महाबोधी महाविहार अंदोलनातील सर्व बौध्द समाज व बौध्दभिख्खु उपोषणास बसले असुन आपण त्वरीत त्यांच्या भावनांचा आदर व विचार करून १९४९ च्या व्यवस्थापन कायदा रद्द करावा व तात्काळ बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे व बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली आहे.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक, भंते सुमंगल, राजेंद्र निकाळजे ,विजमाला धावारे,मार्गदर्शन केले. या आंदोलनास बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट दाळिंब, वैशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था येळी, युगप्रवर्तक विहार चॅरिटेबल ट्रस्ट सालेगाव, यांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा पत्र देण्यात आले. यावेळी मा. जि प. सदस्य कैलास शिंदे, दिलीप भालेराव, मा. समाज कल्याण सभापती हरीश डावरे, दत्ता रोंगे,ॲड. हिराजी पांढरे, भारतीय बौद्ध महासभा लोहारा तालुकाध्यक्ष तानाजी माटे, जालिंदर कांबळे, रामभाऊ गायकवाड, मच्छिंद्र सरपे, तानाजी माटे, अविनाश भालेराव,दिलीप सोनकांबळे, ब्रम्हानंद गायकवाड, नेताजी गायकवाड ,प्रा.गौतम सुरवसे, विनोद कांबळे, गुणवंत गायकवाड, संदीपान कांबळे, कोंडीबा गुरवे, बाळासाहेब भोसले, किरण कांबळे, विद्याताई कांबळे, सोनाली कांबळे, लताताई कोल्हे, जीवन सूर्यवंशी, मिथुन कांबळे, उद्धव गायकवाड, दयानंद कांबळे यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अनंत कांबळे, सुत्रसंचलन राजेंद्र सुर्यवंशी, आभार संतोष सुरवसे यांनी मानले.