संत तुकाराम सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम ; बावीस महिलांना आदर्श नारी जिवन गौरव पुरस्कार प्रदान

0
45

नळदुर्ग :- महिला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हक्काचं संरक्षण व त्यांचे सशक्तीकरण आणि समाजातील सामाजिक धार्मिक राजकीय व शैक्षणिक कार्यात महिलाचे योगदान महत्वाचे आहे महिलाचा समाजात आदर केला जातो ज्यांनी समाजात एक वेगळीच ओळख निर्माण केली महिला विकासा साठी अनेक योजना राबविल्या जातात या योजने अंतर्गत काही महिला वंचित आहेत प्रत्येक योजनेची माहिती व्हावी महिलाना समान संधी मिळायला हवी प्रत्येक महिलांची मान उंचावली हवी महिलाला सन्मान मिळायला हवा प्रत्येक घरात मा जिजाऊ व सावित्रीमाई तयार झाल्या पाहिजेत आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय महिलांचा आदर व सन्मान करण्याचा संदेश देतोय म्हणूनच महिला सशक्त झाली तरच समाज सशक्त होईल यात शंका नाही आणि हे आपण प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे आसे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते तथा विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यानी केले .नुकताच ” आपल घर ” नळदुर्ग येथे संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगांव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आदर्श नारी जिवन गौरव पुरस्काराने २२ महिलांना सन्मानित करण्यात आले यावेळेस अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते .प्रथमता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले . अणदूर येथील स्वरलता सरिता ढेपे , सचिन ढेपे , रेखा सोनटक्के , चंद्रकांत गुड्ड , यानी खूप चांगल्या पद्धतीन सदाबाहर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी केले . तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी किशोर गोरे , विजयकुमार माने अध्यक्ष बालकल्याण समिती धाराशिव एक आदर्श उद्योजिका अंबिका गावडे , बालकल्याण समिती सदस्या ॲड मैना भोसले , ॲड सुजाता माळी , ॲड दिपाली जाहागीरदार , वैशाली धावणे , बालकल्याण मंडळाचे सदस्य डॉ अश्रुबा कदम , हे होते . प्रत्येकानी आपआपली मनोगत व्यक्त केले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव यांच्या वतीने अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता . यावेळी अनिता विक्रम गायकवाड , अनिता आत्माराम पवार , श्रीमती आशा भिसे , साक्षी अरविंद बनसोडे , अरुणा विश्वनाथ कानडे , सविता प्रकाश अवचार , संगीता संजय सावळकर , उमादेवी सातलिंग स्वामी , स्मिता ज्ञानेश्वर फडणीस मैना मुरलीधर भोसले ॲड सुजाता लक्ष्मण माळी , ॲड दिपाली शिवाजीराव जहागीरदार ॲड वैशाली धावणे , राहू संजय पाटील / भोसले , बेबी सरोजा विजयकुमार माने ,अंबिका मल्लिनाथ गावडे , रेखा सिद्धू सोनटक्के , सरिता सचिन ढेपे आशाबाई प्रदीप पाटील , जय श्री भगवान कांबळे , सुलक्षणा प्रवीण आनंदगावकर , शैला दिगंबर मोळगडे , या महिलांना आदर्श नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार अणदूर गावचे माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रबोध कांबळे , अनिता कांळुके , अनुसया कांबळे , संगीता क्षिरसागर , पत्रकार सचिन तोग्गी , संजय आलुरे , एस के गायकवाड , माणिक निर्मळे , तिरगुळे , दादासाहेब बनसोडे प्रदीप पाटील यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here