शिव बसव राणा या महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव समाजावर आसावा :- उमाकांत मिटकर 

0
15

 

दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग:-  हिंदवी स्वराज्य संस्थापक , बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज व विर महाराणा प्रतापसिंह या महा पुरुषांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रत्येक तरुणाने मार्ग्रक्रमण करण्याची आजच्या काळाची गरज आहे . केवळ प्रतिमांचे पूजन करून जयंती साजरी केली जाते त्या महापुरुषांना तेवढ्याच ताकदीने त्यांचे विचार आत्मसात करत त्यांचे कार्य प्रत्येक घरा घरात पोहचले पाहिजे आसे परखड मत महाराष्ट्र राज्य पोलीस दल तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी केले .नळदुर्ग शहरात दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महत्मा बसवेश्वर महाराज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती एकत्रीत साजरी केली जाते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करताना व्यक्त केले . यावेळी नळदुर्ग जन्मोत्सव समितीचे महाराष्ट्र विरशैव सभा सोलापूर शहर अध्यक्ष , राज पाटील अध्यक्ष संतोष पुदाले ,उपाध्यक्ष वैभव पाटील , प्रमोद कुलकर्णी , कोषाध्यक्ष नवलकुमार जाधव , शिवय्या स्वामी , नितीन कासार , ॲड अरविंद बेडगे , कमलाकर चव्हाण , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , सुधिर भय्या हजारे , बसवराज धरणे , अमृत पुदाले , संजय जाधव , सरदारसिंग हजारे , गणेश मोरडे विजय ठाकूर , अजय दासकर , आदींचा स्वागत पर सत्कार करण्यात आला . यावेळी ॲड अरविंद बेडगे यांच्या कडून देशात अनेक भागात सध्या छावा चित्रपटाने पहिल्या टप्प्यात अनेकांच्या मनात घर करून केले आहे तो छावा चित्रपट ॲड अरविंद बेडगे यांच्या कडून दाखविण्यात आला .या चित्रपटाला महिला पुरुष व बालकानी तुफान गर्दी केली होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here