उमरगा – गेल्या एक एक वर्षाच्या कालावधि दरम्यान राज्यातील २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यां कडे सरकार जाणीव पूर्वक दुर्लक्ष करित आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यां साठी किसान जिहादी म्हणून लढत रहाणार असल्याची माहिती जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दिली . १९ मार्च १९८६ साली यवतमाळ जिल्हातील चिलगव्हाण गावचे सरपंच तथा प्रतिष्ठीत शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी आपली पत्नी व चार मुलां सह राज्यात सर्वप्रथम आत्महत्या केली. चार मार्च २०२२ रोजी पंढरपूर जवळ असलेल्या मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. सततच्या नापीकीला कंटाळून व कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात शेतकऱ्यांना आधार देता यावा यासाठी जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आदर्श महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विनायकराव पाटील यांनी हि माहिती दिली.देश भरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या द कश्मीर फाईल या चित्रपटावर तसेच मणिपूर मध्ये मैतयी आणि कुकी या दोन समाजात जातीय संघर्ष सुरु आहे . शेकडो मणिपूर नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे . महिलां अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात खंडणी मागणी च्या कारणा वरून सामान्य माणसांची हत्या केली जात आहे.महापुरुषा बद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे. अश्या या विदारक घटनांचे आपल्या सोयी प्रमाणे उलट – सुलट अर्थ काढून सामाजिक अस्थिरता निर्माण करित आहेत.एका बाजूला अर्थपोटी राहून रात्रंदिवस काबाडकष्ट करून देशातील जनतेची भूक भागविणारा अन्नदाता मात्र विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. दुसऱ्या महायुद्धात जेवढे सैनिक मारले गेले नाहीत त्यापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जीवन संपविलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत शासन व समाज कोणीही कांहीच बोलत नाहीत.बुडते हे जग देखवी डोळा या तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे आता हे सर्व सहन होत नाही . पहावत नाही . माझ्या संयमाचा अंत संपत चालला असल्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यां च्या विविध प्रश्नांसाठी माझा लढा किसान जिहादी म्हणून सुरूच रहाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.