पर्यावरण संवर्धनासाठी चिमणी पक्षाचे संवर्धन गरजेचे — डॉ.मनोरंजना निर्मळे

0
82

पर्यावरण संवर्धनासाठी चिमणी पक्षाचे संवर्धन गरजेचे ..डॉ.मनोरंजना निर्मळे

उमरगा:-  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे २० मार्च २०२५ रोजी *जागतिक चिमणी दिवस साजरा* करण्यात आला . दिवसेंदिवस चिमण्यांची घटती संख्या चिंतनाचा विषय झालेला आहे. जगभरात जवळजवळ 26 चिमण्यांच्या प्रजाती आढळतात त्यापैकी पाच प्रजाती भारतात आढळतात, त्यातील काही प्रजाती नामशेष झालेले आहेत . चिमण्या या नैसर्गिक जीव संदेशक आहे. त्याची घडती संख्या मोठ्या पर्यावरणीय असंतुलन दर्शवते. चिमणी ही परिसंस्थेचा घटक आहे आणि अन्नसाखळीचा एक भाग आहे त्याच्या नसल्याने अन्नसाखळी खंडित होऊ शकते, त्याचा दूरगामी परिणाम त्या परिसंस्थेवर होऊ शकतो. परिसंस्था असंतुलत होते आणि हे टाळण्यासाठी परिसंस्था संतुलित राहण्यासाठी किंवा जैवविविधता संपन्न राहण्यासाठी चिमण्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शहरीकरणामुळे किंवा जंगलतोडीमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झालेले आहे त्या ठिकाणी मोठमोठे काँक्रीटचे घरे निर्माण झालेले आहेत . त्यांचे घरटे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, वाढते प्रदूषण पाणी प्रदूषण ,जमिनीचे प्रदूषण ,हवेचे प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती परिणाम झालेला आहे .त्यामुळे त्यांची संख्या घटत चाललेली आहे. रासायनिक खताचा अतिवापर त्यामुळे अनेक प्राणी ,पक्षी मृत्युमुखी पडत आहे यासाठी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. असे मत प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.मनोरंजना निर्मळे मॅडम यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन अस्वले सर यांनी मार्गदर्शनातून काही उपाय सुचवलेले आहेत चिमण्यांना पाणी उपलब्ध करून देणे , अन्न धान्य उपलब्ध करून देणे ,कृत्रिम घरटे बांधणे, प्रदूषण कमी करणे ,रासायनिक खताचा वापर टाळणे. असे मत त्यांनी व्यक्त केले. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ व्ही एस इंगळे सर सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे आभार डॉ पी एल सावंत मॅडम यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here