लोहारा :- तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील पिके, फळबाग, विट उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान माळेगाव शिवारात लोहारा– आष्टामोड रस्त्यावर विद्युत खांब पडल्याने वाहतुक कोडमली होती. तर वादळी वार्याने घरावरची पत्रे ंउडाले. यात पत्र्यावरील दगड डोक्यावर पडुन एक महिला गंभीर जख्मी झाली. हि घटना गुरुवारी रात्री 8 ते 9 वाजायच्या सुमारास घडली. लोहारा तालुक्यात सुर्य आग ओकत असल्याने उष्णतेने नागरिक उखडुन निघत आहेत. दि.20 मार्च रोजी अचानक पुर्व दिशेला विजांचा कडकडाट सुरु झाला. आभाळ भरुन आले. त्यातच जोरदार वादळ सुटले. लोहारा तालुक्यातील सास्तुर, माकणी, माळेगाव, तावशीगड, अचलेर, धानुरी, तोरंबा, हराळी, करजगाव, चिंचोली काटे, चिंचोली रेबे, पांढरी, हिप्परगा सय्यद या गावांना अक्षरशः झोडपुन काडले. सध्याचे सुगीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गहु, ज्वारी, हरभरा काढुन रानावर ठेवली आहे. तर कांही शेतकऱ्यांची पिके रानावर उभी आहेत. या वादळामुळे काढुन टाकलेली पिके जाग्यावर भिजुन गेली. उभी पिके जमिनदोस्त होऊन प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये द्राक्ष, आंबा, या फळबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील विट भट्टी उत्पादक व्यवसायीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील माळेगाव येथील अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पत्र्यावरील दगड डोक्यावर पडुन मंदाकिनी सत्यवान गुंड (माळेगाव) या गंभीर जख्मी झाल्या आहेत. माळेगाव शिवारात लोहारा आष्टामोड रस्त्यावर विद्युत खांब पडल्याने वाहतुक कोडमडली. सरपंच वैभव पवार, पोलीस पाटील बालाजी कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. सय्यद हिप्परगा येथील अंब्याची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. तरी नागरिकांचे व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची शासनाने पंचनामे करुन मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतुन व नागरिकांतुन होत आहे.