उमरगा :- शहरातील शिवपूरी भागात असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे दि.25 रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा – 2 अंतर्गत सूक्ष्म नियोजन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 25 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरगा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा – २ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवून हवामान अनुकूलन गाव विकास आराखडा तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यात आले सदर प्रशिक्षण साठी धाराशिव चे उपविभागीय कृषी अधिकारी, महादेव आसलकर हे उपस्थित होते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत उमरगा तालुक्यातील 21 गावे तसेच लोहारा तालुक्यातील 6 गांवांचा समावेश करण्यात आला आहे. या गावामध्ये ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच ग्राम कृषि विकास समिती अध्यक्षांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. दि.25 रोजी तालुका बिज गुणन केंद्र उमरगा येथे ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाची ओळख व गावस्तरावर करावयाचे सुक्ष्म नियोजन या बाबत तालुकास्तरीय एक दिवशीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. तालुका कृषि अधिकारी रितापुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. तर उपविभागीय कृषि अधिकारी महादेव आसलकर यांनी सुक्ष्म नियोजन, गांव आराखडा यांचे महत्व याबाबत माहिती दिली.प्रकल्प सहाय्यक नारायण जोशी यांनी या गावातील कृषी सहाय्यक, स्वयंसेवक यांना हवामान अनुकूलन आराखडा तयार करताना 5 दिवसांत करावयाची कामे प्रभात फेरी, गाव नकाशा-उपलब्ध सामाजीक व आर्थीक माहितीची पडताळनी करणे, समय रेषा व परिस्थती वश्लेिषन-नैसर्गीक संसाधने व वनउपज, शेती विषयक समयरेषा व हवामान अनुकुलतेवर लक्षगट चर्चा, शिवार फेरी, पाणलोटाची कामे, संसाधन नकाशा, समय रेषा-परिस्थिती विश्लेषन व मुल्य साखळी पशुधन, महिला सभा, पाण्याचे अंदाजपत्रक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षणास तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, स्वयंसेवक उपस्थित होते.