औसा :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत पणन विभागामार्फत राज्यभर “स्वच्छ बाजार समिती आवार अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत औसा बाजार समिती येथे आ.अभिमन्यु पवार यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियान अंतर्गत आ.अभिमन्यु पवार यांच्या समवेत सभापती, उपसभापती, संचालक, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी बांधवांनी स्वच्छता करून सर्व परिसर स्वच्छ केला.